
पावसाळ्यात आहारात होणाऱ्या 'या' बदलांमुळे वाढू शकतो Food poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार
पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात?
जीवनशैलीतील कोणत्या चुका आजारपण वाढवतात?
पावसाळ्यात कापलेली फळे का खाऊ नयेत?
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंड वातावरण झाले आहे. यासोबतच आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. वातावरणात वाढलेल्या गारव्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस मोठ्या प्रमाणावर वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. फूड पॉयझनिंग, टायफॉईड, पोटासंबंधित विकार, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांमध्ये वाढ झाली आहे. साथीच्या किंवा संसर्गजन्य आजारांची शरीराला लागण झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. पावसाळ्यात आजारपणात वाढ झाल्यामुळे अनेक लोक सतत आजारी पडतात. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंडावा निर्माण होतो पण शरीरास हानिकारक असलेले विषाणू झपाट्याने वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, दूषित पाण्याचे सेवन किंवा विकतचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवून संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय पावसाळ्यात आहारात होणाऱ्या बदलांमुळे फूड पॉयझनिंगचा धोका सुद्धा वाढू लागतो. त्यामुळे विकतचे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात आहारात होणाऱ्या कोणत्या बदलांमुळे आरोग्य बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे बदल शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी सामान्यपणे भूक लागल्यानंतर फळांचे सॅलड किंवा विकतची फळे आणून खाल्ली जातात. पण पावसाळ्यात कच्च्या भाज्यांचे सॅलड किंवा फळाचे सॅलड खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. ओल्या मातीमुळे पॅथोजेन्स जन्माला, जे पाण्यातून थेट शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्यात भाज्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच शिजवून खाव्यात. या दिवसांमध्ये कच्च्या भाज्या खाण्याऐवजी स्टीम, शिजलेल्या आणि उकडलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो.
विकत मिळणारी सामोसा किंवा वडापावची चटणी सगळेच आवडीने खातात. पण चटणी तयार करताना काहीवेळा योग्य पाण्याचा वापर केला जात नाही. याशिवाय हिरवी चटणी बनवताना कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतला जात नाही. यामुळे पोटाला इन्फेक्शन होण्याची खूप जास्त शक्यता असते. चटणी कच्ची वाटल्यामुळे त्यातील जंतू नष्ट होत नाहीत आणि बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होऊन आरोग्य बिघडते.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कायमच पाणी गरम करून प्यावे.पाण्यातील विषारी घटक पोटात प्रवेश करतात आणि त्यानंतर रक्तात मिक्स होतात. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पाणी प्रत्येक वेळी सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे कायमच उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्यावे. बाहेर कुठेही गेल्यानंतर पॅक बंद पाण्याची बाटली खरेदी करावी. पावसाळ्यात “शिजवा, उकळा, सोलून खा किंवा टाळा” असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Ans: पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्यामुळे अन्नामध्ये जीवाणू, विषाणू आणि बुरशीची वाढ वेगाने होते. त्यामुळे दूषित अन्न खाल्ल्यास फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.
Ans: मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप, अशक्तपणा आणि निर्जलीकरण ही फूड पॉइझनिंगची सामान्य लक्षणे आहेत.
Ans: उघड्यावर मिळणारे स्ट्रीट फूड, शिळे अन्न, नीट न धुतलेली फळे-भाज्या, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस, मासे आणि दूषित पाणी टाळावे.