
मागचे वर्षभर देशात उपोशनांचे वारे वाहत होते, अजूनही आहे. आपल्यालाही एक सामान्य माणूस म्हणून असा प्रश्न पडत असावा कि विना अन्न-पाण्याशिवाय मानवी शरीर किती दिवस तग धरू शकते. ही गोष्ट बऱ्याच इतर गोष्टींवर अवलंबून असते. विज्ञानाच्या नियमानुसार, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय सामान्यतः ३ ते ५ दिवस आणि अत्यंत कठीण परिस्थितीत जास्तीत जास्त १ ते २ आठवडे जगू शकते. शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते; पाणी न मिळाल्यास डिहायड्रेशनमुळे शरीराचे अवयव निकामी होऊ लागतात.
बिना पाण्याचे किती दिवस जगू शकतो मनुष्य?
दुसरीकडे, जर पाणी मिळत असेल पण अन्न नसेल, तर निरोगी माणूस ३ ते ८ आठवडे म्हणजे जवळपास २ महिने जगू शकतो. जेव्हा अन्न मिळत नाही, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी स्वतःच्या आत साठवलेली चरबी आणि स्नायू वापरू लागते याला विज्ञानाच्या भाषेत ‘किटोसीस’ म्हणतात. माणसाच्या शरीरात जितकी जास्त चरबी असेल, तितके जास्त दिवस तो अन्नाशिवाय काढू शकतो.
सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचा
अन्नाशिवाय सर्वात जास्त दिवस जगण्याचा जागतिक विक्रम ‘अँगुस बार्बेरी’ या स्कॉटलंडच्या व्यक्तीच्या नावावर आहे. १९६५ मध्ये त्यांनी तब्बल ३८२ दिवस काहीही न खाता उपवास केला होता.
त्यांचे वजन २१४ किलो म्हणजे खूप जास्त होते. डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली त्यांनी हा उपवास केला. या काळात त्यांनी फक्त पाणी, चहा, कॉफी आणि शरीरासाठी आवश्यक असणारी काही जीवनसत्त्वे व पोटॅशियम घेतले. त्यांच्या शरीराने साठवलेली चरबी जाळून ऊर्जा मिळवली. ३८२ दिवसांनंतर त्यांचे वजन ८० किलो झाले होते.
बिना अन्न-पाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!
ऑस्ट्रियाच्या अँड्रियास मिहावेझ नावाच्या १८ वर्षांच्या मुलाच्या नावावर बिना अन्न-पाण्याचा सर्वात मोठा विक्रम आहे. १९७९ मध्ये पोलिसांनी त्याला एका कोठडीत कोंडले आणि विसरले. तो तब्बल १८ दिवस बिना अन्न-पाण्याचा तिथे जिवंत राहिला. कोठडीच्या भिंतीवरील ओलसरपणा चाटून त्याच्या शरीराने थोडे पाणी मिळवले होते, ज्यामुळे तो वाचला होता.
चेतावणी:असे उपवास अतिशय प्राणघातक,जीवघेणे ठरू शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहसा असे धाडस कधीही करू नये.