(फोटो सौजन्य: Pinterest)
कुंडीत अदरक कसे उगवावे?
अदरकचे झाड लावण्यासाठी सर्वप्रथम एक निरोगी आणि ताजे मूळ निवडा. मूळ खूप मऊ, कोरडे किंवा बुरशीयुक्त नसावे. त्याला लहान कोंब आलेले असतील तर उत्तम कारण यातूनच पुढे नवीन कोंब येतात. याशिवाय तुम्हाला या झाडासाठी एक मोठ्या कुंडीची निवड करावी लागले. पसरट, मोठ्या आकाराच्या कुंडीत झाडाची योग्य वाढ होईल. आल्याची मुळे जमिनीखाली पसरतात, त्यामुळे खूप खोल कुंडीपेक्षा रुंद कुंडी अधिक योग्य ठरते. कुंडीच्या खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी काही छिद्रे करायला विसरु नका.
‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
या गोष्टी लक्षात ठेवा
अदरकच्या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एक म्हणजे मातीतील ओलावा, माती ओलसर राहिली पाहिजे पण त्यातून पाण्याचा निचरा होणेही आवश्यक आहे. पाणी मातीत साचून राहता कामा नये. जास्त पाण्यामुळे मातीतील मुळे सडू शकतात आणि तुमची सर्व मेहनत वाया जाईल.
आल्याचे कंद कसे तयार करावे?
निवडलेल्या आल्याला लहान तुकड्यांमध्ये कापता येते. लक्षात ठेवा की, निवडलेल्या तुकड्यावर एक किंवा दोन निरोगी कोंब आल्याची खात्री करा. या कोबांमधूनच नवीन आले उगवण्यास मदत होईल. लागवड करण्यापूर्वी कंदाचे तुकडे काही तास पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर माती तयार करा. सामान्य मातीत थोडे सेंद्रिय खत आणि कोकोपीट मिसळल्याने माती भुसभुशीत होते. यामुळे मुळांना आणि कंदांना पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळते.
कुंडीत आले उगवण्याची योग्य पद्धत
कुंडीत तयार माती भरल्यानंतर आल्याचे तुकडे २ ते ५ सेंटीमीटर खोल पुरा. कोंब असलेला भाग वरच्या बाजूला ठेवा आणि त्यावर थोडीशी माती घाला. यानंतर मातीत थोडं पाणी घाला. इथे अनेकदा लोक एक चूकी करतात की, लागवड केल्यानंतर मातीत भरपूर पाणी घालतात. लक्षात घ्या, जास्त पाणी घालणे देखील झाडासाठी चांगले नसते. माती कोरडी वाटत असल्यास वरुन हलकं पाणी घाला. पावसाळ्यात जर वातावरण दमट असेल तर पाण्याची कमी गरज भासू शकते.
रोपाची काळजी कशी घ्यावी?
कुंडीला नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. वेळोवेळी खत टाकायला विसरु नका. यासाठी तुम्ही सेंद्रिय खत किंवा गांडूळ खताचा वापर करु शकता. हे लक्षात घ्या की, वरुन दिसणारे रोप हे झाडाची खरी वाढ दाखवत नाहीत. खरे मूळ हे मातीच्या आत येत असते. त्यामुळे सुरुवातीलाच जर रोप लहान दिसत असेल तर काळजी करु नका.
आले कधी काढावे?
आल्याची वाढ होण्यासाठी साधारण काही महिन्यांचा अवधी लागतो. जेव्हा रोपांची पाने हळूहळू पिवळी होऊ लागतात आणि नवीन वाढ कमी होऊ लागते, तेव्हा मातीच्या आत मुळे तयार होत येण्याची वेळ जवळ आलेली असते. गरजेनुसार, हवे तितके आले आपण काढू शकतो. आले कुंडीत लावणे म्हणजे फक्त पैसे वाचवणे नाही तर घरातच आपली बाग तयार करण्याची एक सुरुवात आहे.






