
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी
सध्या तरुणांना धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे पालकांची काळजी घेण्यास वेळ नाही अशी परिस्थिती आहे. त्यातही नोकरी व्यवसायासाठी शहरात किंवा परदेशात राहणारे अनेकजण आईवडिलांना गावी सोडून शहरात आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत. अशा ज्येष्ठांची देखभाल करणे हे समाजापुढचे मोठे आव्हान आहे. यामुळे पालकांचा सांभाळ हा फक्त इतरांना दाखवण्यासाठी नाही तर ते संवेदनेतून करावा असे तज्ज्ञ सांगतात.(फोटो सौजन्य – istock)
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
वयात ज्येष्ठांना मानसिक आधार गरजेचा असतो. अशावेळी ते त्यांना होणाऱ्या त्रासाबदद्ल मुलांना सांगत राहतात. अशावेळी त्यांच्यावर न खेकसता शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यावे. त्यामुळे तुम्ही त्यांचा त्रास समजून घेता असे त्यांना वाटते आणि त्या भावनेनेच ते लवकर बरे होतात. एकीकडे आई वडील जसे वयस्क होत असतात. तसेच दुसरीकडे तुमचेही वय वाढत असते. आज ज्या स्टेजवर आई वडील आहेत त्याच स्टेजवर तुम्हीही येणारच. त्यामुळे तुम्ही तुमच्या पालकांबरोबर कसे वागता ते बघूनच तुमची मुलंही उद्या तुम्हाला तशीच ट्रिटमेंट देणार हे प्रत्येक पालकाने लक्षात ठेवावे.
वाढत्या वयात ज्येष्ठांना अनेक व्याधी जडतात. यामुळे त्यांचे नियमित मेडीकल चेकअप, औषधौपचार मुलांनीच करायला हवेत. तसेच आई वडीलांच्या राहण्याच्या ठिकाणीही स्वच्छता ठेवावी. आई वडील आजारी असल्यास त्यांना हॉस्पीटल महद्ये दाखल करणे शक्य नसेल किंवा त्यांची तशी इच्छा नसेल तर घरातच त्यांच्यावर ट्रिटमेंट करावी. त्यासाठी घरातील एका रुममध्ये त्यांची व्यवस्था करावी.
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’
आई वडील आयुष्यभर आपल्या मुलांची उत्तम देखभाल करण्यासाठी झटत असतात. पण वार्धक्य आल्यावर आपल्या मुलांनी देखील आपला सांभाळ करावा अशी त्यांची अपेक्षा असते. उतार वयात आईवडिलांची काळजी घेणे ही कौटुंबिकच नाही तर सामाजिक आणि नैतिक जबाबदारीही असते.पण अशावेळी कमावती मुले त्यांच्या हातात औषधोपचारासाठी, खाण्यापिण्यासाठी पैसे देतात, हे अत्यंत अपमानास्पद कृत्य असून पालकांनी कष्टाने मुलांना वाढलेले त्यांच्या प्रेमाची किंमत पैशात करण्याची घोडचूक मुले येथेच करतात.कारण या वयात ज्येष्ठ व्यक्ती एकट्या पडलेल्या असतात. आपल्याशी मुलांनी बोलावं गप्पा माराव्यात, विचारपूस करावी अशी त्यांची अपेक्षा असते. पण मुलांना त्यात स्वारस्य नसते. यामुळे पालक मनातून खचतात. भावनात्मक एकटेपणाने ग्रस्त असतात.