Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीच्या रक्तामुळे कोणते आजार वाढतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी

मासिक पाळीच्या रक्तात अतिशय घातक विषाणू आढळून येतात. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. पाळीच्या रक्तात कोणते विषाणू आढळतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2026 | 02:01 PM
मासिक पाळीच्या रक्तामुळे कोणते आजार वाढतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी

मासिक पाळीच्या रक्तामुळे कोणते आजार वाढतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीच्या रक्तात कोणते विषाणू असतात?
पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची कशी काळजी घ्यावी?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या?

प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येणे हे स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक चक्र आहे. वयाच्या १२ किंवा १३ व्या वर्षांपासून मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. दर महिन्याला गर्भाशयाचे अस्तर गळून पडते आणि योनीमार्गाद्वारे रक्तस्त्राव होतो. या प्रक्रियेदरम्यान महिलांना शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, पेटके येणे, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवतात. मासिक पाळीचे चक्र साधारणता २८ दिवसांचे असते. पण जीवनशैलीतील चुका आणि शरीरसंबंधित आजारामुळे चक्रात बदल होण्याची जास्त शक्यता असते. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येऊन आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या रक्तात कोणते विषाणू आढळतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक काढ्याचे सेवन, वाढलेले वजन महिनाभरात होईल कमी, दिसाल स्लिम

मासिक पाळीच्या रक्तात कोणते विषाणू असतात?

मासिक पाळीच्या रक्तात एचआयव्ही (HIV), हिपॅटायटीस बी (HBV) आणि हिपॅटायटीस सी यांसारखे गंभीर विषाणू असतात. पाळीच्या दिवसांमध्ये शरीरातून बाहेर पडणाऱ्या रक्तामध्ये असंख्य धोकादायक विषाणू आढळून येतात. त्यामुळे पाळी आल्यानंतर योग्य स्वच्छ राखणे आणि सुरक्षितता बाळगणे फार आवश्यक आहे. तसेच रक्ताव्यतिरिक्त, योनीमार्गातील जीवाणू आणि काही वेळा यीस्ट संसर्ग सुद्धा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.

संसर्गापासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला गंभीर आजाराची लागण होते. त्वचा संसर्ग होऊन रॅश येणे, त्वचा लाल पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये कॉटनच्या अंतर्वस्त्रांचा वापर करावा. याशिवाय आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि सुका मेव्याचे सेवन करावे. पाळी आल्यानंतर दर ४ ते ५ तासांनी पॅड बदलते राहावे.यामुळे बॅक्टेरियाची वाढ होत नाही. तसेच नाजूक अवयव दिवसभरातून तीनदा किंवा चार वेळा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्यावे.

खराब पचन तुमची स्मरणशक्ती कमकुवत करू शकते; अभ्यासातून गट हेल्थ आणि मेंदूचा संबंध उघड झाला, वेळीच सावध व्हा!

मासिक पाळी आल्यानंतर दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ होते. वापरलेले पॅड पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे. उघड्यावर पॅड कुठेही टाकू नये. यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. पाळी आल्यानंतर चहाचे सेवन करण्याऐवजी कॉफी किंवा आल्याचा चहा प्यावा. यामुळे स्नायूंवर वाढलेला तणाव कमी होतो. नाजूक अवयव स्वच्छ करताना साबणाचा वापर करू नये. साबणाच्या वापरामुळे रॅश किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळीमध्ये किती रक्तस्त्राव सामान्य आहे?

    Ans: साधारणपणे, एका चक्रात ३०-८० मिलीलीटर रक्तस्त्राव होणे सामान्य मानले जाते.

  • Que: मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता कशी ठेवावी?

    Ans: सॅनिटरी पॅड, टॅम्पन्स किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करावा. पॅड दर ४-६ तासांनी बदलणे आवश्यक आहे, ज्यामुळे इन्फेक्शन टाळता येईल.

  • Que: मासिक पाळीत व्यायाम करू शकतो का?

    Ans: होय, हलका व्यायाम जसे की चालणे किंवा योगासने केल्याने पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते, परंतु जड व्यायाम टाळावा.

Web Title: Menstrual blood warning signs health problems that can be indicated during periods and how to prevent infections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • menstruation
  • period
  • women health

संबंधित बातम्या

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?
1

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द
2

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द

School Period Rules: शाळांमध्ये एक तास ‘४५ मिनिटांचाच’ का असतो? ‘या’ निर्णयामागचे वैज्ञानिक कारण वाचा एका क्लिकवर..
3

School Period Rules: शाळांमध्ये एक तास ‘४५ मिनिटांचाच’ का असतो? ‘या’ निर्णयामागचे वैज्ञानिक कारण वाचा एका क्लिकवर..

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका
4

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.