Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Home Tips: पावसाळ्यात फुगतोय दरवाजा, घराची होतेय पडझड; कुलुपांची कशी घ्याल काळजी वापरा सोप्या टिप्स

पावसाळ्यात घरामध्ये अनेक गोष्टी बिघडतात. शरीरासाठी थंडावा देणारा पाऊस घरासाठी मात्र अनेकदा डोकेदुखी ठरतो. पावसाळ्यात घरातील गोष्टींची काळजी कशी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी दिल्या आहेत सोप्या टिप्स

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 20, 2025 | 12:53 PM
पावसाळ्यात घर, कुलुपांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यात घर, कुलुपांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील उन्हाळा हा कडक उष्णतेसाठी ओळखला जातो. यामुळे लोक मान्सूनची, त्यामुळे येणाऱ्या थंडाव्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाचा पहिला थेंब पडताच, छत्र्या, रेनकोट आणि वॉटरप्रूफ गोष्टी कपाटातून बाहेर येतात. कारण पाऊस आवडत असला तरी प्रत्येकालाच बाहेर कोरडे राहण्याची इच्छा असते. या सर्व तयारी दरम्यान, एक महत्त्वाचा पैलू नेहमीच दुर्लक्षित केला जातो, तो म्हणजे आपल्या घरातील कुलूपांची काळजी. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी पावसाळा गरजेचं असला तरी अनेकदा तो घरमालकांसाठी नवीन आव्हाने देखील आणतो, विशेषतः दरवाजांची कुलुपे. 

पावसाळ्यात सामान्यतः आर्द्रता जास्त असते आणि अचानक येणारा पावसामुळे धातूच्या वस्तूंना गंज चढतो किंवा त्या जाम होतात. यामुळे सुरक्षा आणि सोय दोन्हीही धोक्यात येऊ शकते. पावसाची तीव्रता आणि अनिश्चितता लक्षात घेता, कुलुपाची योग्य देखभाल केवळ कार्यक्षमतेसाठीच नाही तर मनःशांतीसाठी देखील आवश्यक असते. श्याम मोटवानी, व्यवसाय प्रमुख – लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्युशन्स, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप यांनी आपल्या वाचकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

पावसाळ्यातील संरक्षण 

सुरक्षितता ही तुमच्या दारापासूनच सुरू होते आणि पावसाळ्यात जर संरक्षणाची ही पहिलीच फळी नीट नसेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कोणत्याही घराच्या सुरक्षिततेमध्ये कुलूप हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जेणेकरून घरात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा निश्चित होईल. त्यांची देखभाल न केल्याने कुलूप तुटणे, ते काम न करणे असे धोके निर्माण होऊ शकतात. 

वास्तुशास्त्रानुसार तुमचे घर कसे असावे? जाणून घ्या

कशी घ्यावी काळजी 

भारतात पावसाळा अनेक महिने असतो म्हणून काही गोष्टींची काळजी काटेकोरपणे घ्यायलाच हवी, जसे की:

  • स्वच्छता: दरवाज्याच्या कुलूपांची नियमित स्वच्छता करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा पावसाळ्यात धूळ आणि ओलावा लवकर जमा होऊ शकते. दरवाज्यांचे हॅण्डल तसेच की होल कापडाने पुसल्याने स्वच्छ राहण्यास मदत होते तसेच यासाठी केमिकल्सचा वापर टाळता येतो. कारण या केमिकल्सनी कुलुपाच्या घटकांना किंवा बाह्य फिनिशिंगला नुकसान होऊ शकते
  • ल्युब्रिकंट्स : जेव्हा कुलुपे अडकू लागतात तेव्हा याची खूप मदत होते. उच्च दर्जाचे वंगण सुरळीतपणे कार्य करण्यास आणि कुलुपाच्या अडकणाऱ्या भागांना सैल करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, तेल-आधारित वंगण टाळायला हवे, कारण यावर धूळ बसण्याचा धोका जास्त असतो. परिणामी, वस्तू अधिक खराब होण्याचा धोका असतो
  • कुलूपांची विशिष्ट काळजी: कुलूप कोणतेही असले तरी त्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यात वेगवेगळे भाग एकत्र केले जातात. त्या सगळ्याची काळजी वेगवेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. पॅड लॉकप्रमाणेच, त्यात अडकलेला कचरा काढून टाकण्यासाठी त्यात दाबयुक्त हवा फवारली पाहिजे. त्याचप्रमाणे, इलेक्ट्रिक पार्ट्स असणाऱ्या डिजिटल लॉकची काळजी घेणे गरजेचे असते. वातावरणाचा परिणाम त्यावरही होतो. अशा कुलूपांच्या बॅटरी सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील असतात, ज्या नियंत्रित ठेवल्या पाहिजेत आणि आवश्यक असल्यास बदलल्या पाहिजेत
  • पाण्याच्या गळती होऊ देऊ नका : कुलूप देखभालीच्या चेकलिस्टमधील ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित सील करून लोकांनी कुलुपे आर्द्रतेच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. यामुळे घरांमध्ये पाणी येणार नाही आणि कशाचेही नुकसान होणार नाही.

नवी लॉकिंग सिस्टिम 

पावसाळा जवळ येत असताना, तुमचे घर केवळ कोरडे राहण्यासाठीच नव्हे तर सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही तयारी करणे गरजेचे आहे. पावसाळी तयारीतील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे तुमच्या घराची लॉकिंग सिस्टम. तीव्र हवामान परिस्थिती – मग ती उष्णता, आर्द्रता किंवा मुसळधार पाऊस असो – यात टिकून राहतील अशा कुलूपांमध्ये गुंतवणूक करणे हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी एक स्मार्ट पाऊल आहे.

उच्च आर्द्रता सहन करण्यासाठी डिझाइन केलेल्या साहित्यापासून तयार करण्यात आलेले हवामान-प्रतिरोधक डिजिटल, यांत्रिक किंवा स्मार्ट कुलूप निवडा. हे कुलूप गंज चढू देत नाही तसेच ओलसर वातावरणातही आपले काम चोख बजावते. अनेक विश्वसनीय ब्रँड आता भारतीय हवामान परिस्थितीनुसार तयार करण्यात आलेले कुलूप देतात, ज्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात टिकाऊपणा तसेच विश्वासार्हता निश्चित होते.

नवीन घराचे बांधकाम करताना या गोष्टी ठेवा, कोणताही राहणार नाही दोष

नियमित काळजी महत्त्वाची

अर्थात असे असले तरीही नियमित देखभाल देखील तितकीच महत्त्वाची आहे. एक साधी नियमित तपासणी गंज, जॅमिंग आणि घराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या इतर समस्या टाळू शकते. त्यामुळेच या पावसाळ्यात एक काळजी घेत तुमचे कुलूप अपग्रेड करा, त्यांची चांगली देखभाल करा आणि तुमचे घर अधिक स्मार्ट तसेच सुरक्षित ठेवणारे कनेक्टेड सुरक्षा उपाय स्वीकारा – मग पाऊस असो की ऊन.

Web Title: Monsoon home tips how to maintain home door and lock in monsoon by expert shyam motwani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • home decor
  • lifestyle news
  • lifestyle news in marathi
  • lifestyle tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

तांब्या पितळेच्या भांड्यांना कसं साफ करावं? स्वयंपाकघरातील या पदार्थांची मदत घ्या; शून्य रुपयांत भांड्यांना मिळेल नव्यासारखी चमक
1

तांब्या पितळेच्या भांड्यांना कसं साफ करावं? स्वयंपाकघरातील या पदार्थांची मदत घ्या; शून्य रुपयांत भांड्यांना मिळेल नव्यासारखी चमक

The Mumbai Litfest: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची लिटरेचर लाईव्हसोबत भागीदारी जाहीर!
2

The Mumbai Litfest: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची लिटरेचर लाईव्हसोबत भागीदारी जाहीर!

विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या
3

विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या

अनेक समस्या एक उपाय ; रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे
4

अनेक समस्या एक उपाय ; रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.