
Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या
काय आहे याचे महत्त्व?
अधिकतर भारतीय लोक ट्रॅव्हल इंश्याॅरंसकडे दुर्लक्ष करत आले आहेत. बऱ्याचदा बजेटच्या कमतरेमुळे याकडे फालतू खर्च म्हणून पाहिले जाते. परंतु बदलते वातावरण आणि वाढते पावसाचे प्रमाण पाहता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा बदलला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात अचानक मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनसारख्या घटनांमुळे ट्रिपची प्लॅनिंग पूर्णपणे बिघडू शकते. अशात ट्रॅव्हल इंश्याॅरंस अशी गोष्टी आहे जी तुमचा आर्थिक खर्चापासून बचाव करु शकते.
कॅन्सलेशनवर मिळेल सवलत
पावासळ्यात फ्लाईट्स डिले होणे किंवा रद्द होणे फार सामान्य होते. ट्रॅव्हल इंश्याॅरंस ‘फ्लाइट डिले कव्हरेज’च्या मदतीने जर तुमची फ्लाईट निर्धारित वेळेपेक्षा फार जास्त लेट झाली असेल तर त्या विलंबासाठी तुम्हाला भरपाई मिळू शकते. तथापि, हे लक्षात घेण महत्त्वाचं आहे की, विलंब असाधारण परिस्थितीमुळे, म्हणजेच एअरलाइनच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमुळे झाला असेल, तर झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी एअरलाइन नेहमीच जबाबदार नसते.
युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम
कोणकोणत्या गोष्टींवर लागू होतो ट्रॅव्हल इंश्याॅरंस?