
Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
मुंबईहून अशी सुरु करा सप्त बद्रि यात्रा
मुंबईहून सप्त बद्रि यात्रा करण्यासाठी सुरुवातील तुम्हाला महाराष्ट्रातून उत्तराखंडमधील हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे पोहोचावे लागेल. इथून तुम्ही पुढे ७ मंदिरांना भेट द्याल. इथे देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग आणि जोशीमठमार्गे बद्रिनाथाचा प्रवास सुरु होईल. येथील बहुतांश रस्ते चांगले आहेत, तथापि पावसाळ्यात इथे जाण्याआधी परिस्थितीचा आढावा नक्की घ्या.
अशाप्रकारे पूर्ण होईल प्रवास
इथे तुम्ही सर्वात आधी बद्रिनाथ मंदिराचे दर्शन घ्याल. इथून परतत असताना पूर्वेला २० किलोमीटर अंतरावर पांडुकेश्वरमध्ये योगध्यान बद्रीला भेट द्या. यानंतर पुढे जाताना नीति घाटीजवळील तपोवन येथे पोहचा आणि ४-५ किलोमीटर पायी प्रवास करुन भविष्य बद्रिचे दर्शन घ्या. इथून पुन्हा जोशीमठला या आणि कर्णप्रयाग रोडवर अणीमठ येथे वृद्ध बद्रिचे दर्शन घ्या. यानंतर हेलंगहून उर्गम खोऱ्याकडे प्रवास करा. इथे एकाच वेळी ध्यान बद्री आणि पंच केदारांपैकी एक असलेल्या कल्पेश्वर महादेवाचे एकत्रित दर्शन घेता येते. शेवटी, कर्णप्रयागहून आदि बद्री येथे पोहोचून सप्त बद्री यात्रा पूर्ण होते.
Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
यात्रेदरम्यान कुठे राहायचे?
रात्रीच्या वेळी मुक्कामासाठी जोशीमठ एक सर्वात उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला बजेट फ्रेंडली हाॅटेल्, धर्मशाळा आणि होमस्टे आरामात उपलब्ध होतील. उर्गम घाटाजवळ देखील होमस्टेची सुविधा मिळते. यात तुमच्या भोजनाचीही सुविधा पुरवली जाते. तुम्ही सकाळी लवकर आपली यात्रा सुरु करु शकता. यात्रेवेळी गरम कपडे, रेनकोट, औषध आणि पैसे घेऊन प्रवासाला सुरुवात करा. लक्षात घ्या, डोंगराळ भागातून प्रवास करताना अनेकदा तुमच्या मोबाईलला नेटवर्क मिळणार नाही त्यामुळे महत्त्वपूर्ण वस्तू आणि माहितीसह यात्रेला सुरुवात करा.