
Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद...
लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…
मल्हारगडाचा इतिहास
मान्यतेनुसार, 12 व्या शतकात राजा ज्वाला सिंह याने ब्रा नदीच्या किनारी या किल्ल्याचे निर्माण केले. या किल्ल्याच्या चारही बाजूला असणारी मजबूत दगडांची भिंत आणि बेतवा नदी यामुळे हा किल्ला अभेद्य मानला जातो. किल्ल्याच्या आत लष्करी बराकी, तोफखान्याची ठिकाणे आणि एक जलाशय आहे. परंतु, योग्य देखभालीच्या अभावामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या काही भागांची आता झीज होत आहे.
राणीला केलं होतं कैद
मल्हारगडविषयी एक रंजक कहाणीफर चर्चेत आहे. या कथेनुसार, एकेदिवशी राणी मछला आपल्या मैत्रिणींसोबत बागेत झोका खेळत होती. याचवेळी राजा ज्वाला सिंह शिकार करून तिथून जात होता. राणी मछलाला बागेत खेळताना पाहून राज ज्वाला सिंह तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्याने तिला मिळवण्यासाठीची योजना आखली.
जादूचा केला वापर
सांगितलं जात की, राणी मछला हिला मिळवण्यासाठी राजाने त्याकाळी जादुई शक्तींचा वापर केला होता. यानुसार, जादुई शक्तींच्या मदतीने त्याने राणी मछला हिला रातोरात आपल्या पलंगासह गायब केलं आणि महालात आणलं. ज्वाला सिंगने राणी मच्छलाला मल्हारगडमधील एका पाण्याच्या कुंडात कैद केले आणि आपली राणी बनवण्यासाठी तिची समजूत काढायला सुरुवात केली. परंतु राणी मछला यासाठी तयार झाली नाही. राजाने तिला ज्या कुंडात कैद केले होते ते कुंड आता मछला कुंडच्या नावाने ओळखले जाते.
युद्ध आणि राणीची मुक्तता
जेव्हा अल्हा आणि त्यांचा शूर भाऊ ऊदल यांना राणी मछला हिच्या अपहरणाची माहिती मिळाली तेव्हा ते त्वरीत आपली विशाल सेना घेऊन मल्हारगडाच्या दिशेने वळले. यानंतर राजा ज्वाला सिंह आणि आल्हा-ऊदल यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात आल्हा-ऊदल यांनी ज्वाला सिंहला पराभूत केले आणि राणी मछलाल कैदेतून मुक्त केले. सांगितले जाते की, हे युद्ध इतके भयानक होते की यानंतर बेतवा नदीचे पाणी लाल रंगाचे झाले होते.