
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
लठ्ठपणामुळे रक्तदाब का वाढतो?
उच्च रक्तदाबाची लक्षणे?
मागील काही वर्षांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरसंबंधित कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. सतत दुर्लक्ष केल्यामुळे शरीरात आजार वाढतो आणि आणखीनच गंभीर होतो. उच्च रक्तदाब शरीरासाठी अतिशय घातक असतो. यामुळे कोणत्याही क्षणी रुग्णाचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी ब्रेन स्टोक येऊ शकतो. ब्रेन स्टोक आल्यानंतर अतिशय गंभीर स्थिती निर्माण होते. डॉक्टरांच्या मते, सुमारे 120/80 मिमीएचजी रक्तदाब सामान्य मानला जातो तर 140/90 mmHg किंवा त्याहून जर अधिक असेल तर हे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब जास्त वेळ टिकून राहिल्यास स्ट्रोक येऊ शकतो. उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा सामान्य दाब . या स्थितीला Hypertension असे सुद्धा म्हंटले जाते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य बिघडते. याला सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हंटले जाते. तुमच्या शरीरात जर उच्च रक्तदाब जास्त वेळ टिकून राहिल्यास हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर वाईट परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.
जीवनशैलीतील बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, एकाजेगावर बसून सतत काम करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. जास्त मीठ असलेले पदार्थ, तेलकट अन्नपदार्थ, फास्ट फूड किंवा जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. याशिवाय आहारात सोडियमचे अतिसेवन केल्यामुळे शरीरसंबंधित गंभीर स्थिती निर्माण होते. सतत मानसिक तणाव, कामाचा दबाव, चिंता किंवा राग यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित होते. यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तदाब सुद्धा वाढतो. लठ्ठपणा हे सुद्धा उच्च रक्तदाब वाढण्याचे महत्वपूर्ण कारण आहे.
शरीराचे वजन वाढल्यानंतर रक्त पंप करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागते. तसेच धूम्रपान केल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होऊन जातो. संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडण्यास उच्च रक्तदाब कारणीभूत ठरतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घ्यावी. वय, अपुरी झोप, मधुमेह आणि किडनीचे आजार इत्यादी आजारांमुळे उच्च रक्तदाब वाढतो.
आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या
डोकेदुखी
चक्कर येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
थकवा वाटणे
हातापायांमध्ये अशक्तपणा जाणवणे
चेहरा वाकडा होणे
काम करण्याची इच्छा न होणे