Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksh 2025 : बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, जिवंतपणीच साधली जाते पितृऋणातून मुक्ती

भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावास्येपर्यंत पितृपक्ष मानला जातो. गयेत पिंडदानाला महत्त्व आहे, पण इथे एक असे ठिकाणही आहे जिथे लोक स्वतःचाच आत्मपिंडदान करून पितृऋणातून मुक्ती साधतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2025 | 08:14 AM
Pitru Paksh 2025 : बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, जिवंतपणीच साधली जाते पितृऋणातून मुक्ती

Pitru Paksh 2025 : बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, जिवंतपणीच साधली जाते पितृऋणातून मुक्ती

Follow Us
Close
Follow Us:

भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून आश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंतचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या दिवसांत लोक आपल्या घरातील निधन झालेल्या पूर्वज, आई-वडील, आजी-आजोबा अशा आप्तांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धा व तर्पण विधी करतात. या पूर्वजांनाच पितृ असे संबोधले जाते. पितृकर्म आणि दानधर्म केल्याने पूर्वज प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे मृत्यूनंतर पिंडदान ही पुढील पिढीने करायची महत्त्वाची परंपरा मानली जाते.

श्री रामाने या ठिकाणी केलं होतं वडील दशरथांच पिंडदान; मोक्षप्राप्तीसाठी लोकप्रिय, आजही इथे जमते शेकडो लोकांची गर्दी

गया येथील आत्मपिंडदान मंदिर

बिहारमधील गया हे पिंडदानासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. येथे पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्यानंतर पितृऋणातून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे. रामायणकाळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. भगवान श्रीरामांनी आपल्या भावांसह गयेतच राजा दशरथांचे पिंडदान करून त्यांना मोक्ष मिळवून दिला होता. त्यामुळे आजही हजारो लोक येथे येऊन पितरांसाठी पिंडदान करतात. पण याच गयेत एक अनोखे मंदिर आहे – जनार्दन वेदी मंदिर, जिथे लोक स्वतःचाच पिंडदान करतात.

आत्मपिंडदानाची परंपरा

गयेत एकूण ५४ पिंडवेद्या व ५३ पिंडदान स्थळे आहेत. मात्र जनार्दन वेदी ही एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध केले जाते. या ठिकाणी लोक जिवंत असतानाच आपले पिंडदान करतात. गयेतल्या भस्मकूट पर्वतावर वसलेल्या मंगला गौरी मंदिराच्या उत्तरेला हे वेदीस्थान आहे. येथे स्वतः भगवान विष्णु जनार्दन स्वामीच्या रूपाने पिंड स्वीकारतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

कोण करतात आत्मपिंडदान?

– ज्यांच्या परिवारात कोणीही वारसदार उरलेला नाही
– ज्यांच्या निधनानंतर त्यांचे श्राद्ध करणारा कोणीही नसेल
– तसेच गृहस्थाश्रमाचा त्याग करून वैरागी झालेले लोक

अशा व्यक्ती स्वतःच्या जिवंतपणी गयेत जाऊन आत्मपिंडदान करतात. ही परंपरा अनोखी असून लोक याला आत्मशांती व मोक्षप्राप्तीचा मार्ग मानतात.

नेपाळ एअरपोर्ट झाला बंद! विरोधानंतर सर्व फ्लाईट्स केल्या रद्द, प्रवासी कसे परतणार घरी? सर्व डिटेल्स जाणून घ्या

FAQs (संबंधित प्रश्न)

पितृ पक्ष का महत्त्वाचा आहे?
पितृ पक्षातील विधींमुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते. पितृदोष कमी करण्यासाठी आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध विधी करणे एक प्रभावी उपाय मानला जातो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये?

काय करावे:

श्राद्ध आणि तर्पण विधी करावे.
पूर्वजांच्या आत्म्याची शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.
पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांना आदर देण्यासाठी नियम पाळावेत.

काय करू नये:

या काळात नवीन कपडे, सौंदर्यप्रसाधने, नवीन मालमत्ता खरेदी करणे आणि नवीन मालमत्ता खरेदी करणे टाळावे, कारण असे करणे अशुभ मानले जाते. या काळात शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे, कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि घरात फिरतात असे मानले जाते. नवीन व्यवसाय किंवा नवीन उपक्रम सुरू करणे टाळावे.

Web Title: Pitru paksha 2025 janarden vedi mandir in gya is the only place where atma pindadaan is done travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • Pinddaan
  • Pitru Paksha
  • travel news

संबंधित बातम्या

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास
1

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास

या पवित्र ठिकाणी पार पडला होता राधा- कृष्णाचा विवाहसोहळा, स्वतः ब्रह्मदेवाने केले होते धार्मिक विधी
2

या पवित्र ठिकाणी पार पडला होता राधा- कृष्णाचा विवाहसोहळा, स्वतः ब्रह्मदेवाने केले होते धार्मिक विधी

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच
3

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

जगातील ते फेमस डेस्टिनेशन्स जे टूरिजममुळे झाले उद्ध्वस्त, एका ठिकाणी झाली आहे ‘Game Of Thrones’ची शूटिंग
4

जगातील ते फेमस डेस्टिनेशन्स जे टूरिजममुळे झाले उद्ध्वस्त, एका ठिकाणी झाली आहे ‘Game Of Thrones’ची शूटिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.