
Relationship Tips: कधीच होणार नाही नवरा-बायकोत भांडणं, ऋजुता दिवेकरच्या ३ टिप्स दीर्घकाळ टिकवून ठेवतील लग्न
नवरा बायकोच्या नात्यांमधील प्रेम वाढण्यासाठी टिप्स.
ऋजुता दिवेकरानी पुरुषांना दिलेले सल्ले.
नातेसंबंध सुधारण्यासाठी काय करावे.
विवाह सोहळा म्हणजे दोन व्यक्तींमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर नाते. लग्नाच्या दिवशी घेतलेल्या सप्तपदीमध्ये पती-पत्नी एकमेकांसोबत आयुष्यभर साथ देण्याची, जबाबदाऱ्या पार पाडण्याची आणि कुटुंब निर्माण करण्याची वचनबद्धता स्वीकारतात. पण बऱ्याचदा स्त्रिया लग्न म्हणजे जुळवून घेण्याच्या आणि त्यागाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. आयुष्यभर नातं कायमच आनंदी आणि टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायको दोघांकडून सुद्धा योग्य प्रेम मिळणे फार गरजेचे आहे. विवाह सोहळ्यात परस्पर आदर, सामंजस्य आणि पाठिंब्याचे नाते टिकून राहणे फार आवश्ययक आहे. यासाठी प्रसिद्ध लेखिका ऋजुता दिवेकर यांनी पुरुषांना काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्यास वैवाहिक जीवन अधिक चांगले आणि आनंदी बनण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – pinterest)
‘यह प्यार नहीं तो क्या है?’ Relationshipचे पण असतात अनेक प्रकार
प्रसिद्ध लेखिका ऋजुता दिवेकर यांच्या मते, यशस्वी आणि सुखी वैवाहिक जीवनाची जबाबदारी केवळ स्त्रियांवरच नसावी; पुरुषांनी सुद्धा बदल घडवून आणण्यासाठी आणि आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुरुषांनी लग्नाआधी आपली विचारसरणी अधिक पुरोगामी केल्यास खूप जास्त फायदे होतील. यामुळे वैवाहिक जीवनात कमीत कमी भांडण होतील. घरातील कामे केवळ स्त्रीचीच जबाबदारी आहे, असे मानणे किंवा तिने नेहमी आपल्या निर्णयांचे पालन करावे अशी अपेक्षा करणे, ही अपेक्षा नात्यांमध्ये ठेवणे चांगले नाही. यामुळे असंख्य मतभेद होऊ शकतात. पण त्याऐवजी पुरुषांनी घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात आणि आपल्या जोडीदाराच्या करिअर, स्वप्ने आणि निवडींचा आदर करावा. दोघांनी एकमेकांना पाठिंबा देऊन कामे केल्यास नात्यांमधील प्रेम वाढेल.
ऋजुता दिवेकरच्या मते, पुरुषांनी आपला जीवनसाथी म्हणून अशा स्त्रीची निवड करावी, जिची स्वतःची ओळख, स्वप्ने आणि करिअर असेल. जर तुमच्या जोडीदाराला आयुष्यात काहींना काही नवीन करण्याची इच्छा असेल तर तिला पाठिंबा देणे फार महत्वाचे आहे. नात्यांमध्ये केवळ एका व्यक्तीच्या स्वप्नांनाच महत्त्व दिले जात नाही तर दोघांनी एकमेकांच्या कामाला आणि आनंदाला पाठिंबा देणे फार आवश्यक आहे.
तुमचे सुद्धा Relationship तुटण्याच्या मार्गावर आहे का? ‘या’ ट्रिक्स …
भारतातील अनेक भागांमध्ये विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. लग्नात सोन, चांदी, गाडी इत्यादी अनेक गोष्टींची मुलीकडे मागणी केली जाते. पण ऋजुता दिवेकरच्या मते, वाढत्या दिखाऊपणाला आणि उधळपट्टीला विरोध करणे फार आवश्यक आहे. विवाह सोहळ्यातील खर्च वडिलांची आयुष्यभराची कमाई सुद्धा असू शकते. त्यामुळे लग्नात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यापेक्षा भविष्यातील नियोजनावर करून पैसे जमा करावेत. लग्नसोहळा कमीत कमी खर्चात कसा पार पडेल त्याकडे जास्त कल ठेवावा.