
पावसाळ्यात डेंग्यूचा वाढता धोका! उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे अधिक महत्वाचे, टळू शकतो मोठा धोका
गेल्या काही वर्षात भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत लक्षणीय बदल झाले आहेत. आरोग्याशी संबंधित धोक्यांना आज केवळ प्रतिसाद देण्यापेक्षा ते होऊ नयेत याच्या पूर्वतयारीवर अधिक भर दिला जातो. तरीही, डेंग्यू आणि तापासारख्या कीटकांद्वारे पसरणाऱ्या आजारांविरुद्धच्या उपाययोजनांमध्ये मात्र या दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. कारण यासंदर्भातील प्रयत्न हे सातत्यपूर्ण आणि प्रतिबंधात्मक असण्याऐवजी बऱ्याचदा तात्पुरते आणि केवळ उद्भवलेल्या परिस्थितीला प्रतिसाद देणारे असतात. सुब्रता पाल, प्रमुख – फ्युमिगंट व्यवसाय आणि सार्वजनिक आरोग्य व्यवसाय, यूपीएल एसएएस यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – istock)
जागतिक पातळीचा विचार करता, डासांमुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो आणि 70 कोटींपर्यंत लोक बाधित होतात. तर देशात डेंग्यूचा प्रादुर्भाव अत्यंत व्यापक झाला आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीजेस कंट्रोल’ (NCVBDC) च्या अहवालानुसार, 17 सप्टेंबर 2023 पर्यंत भारतात डेंग्यू संसर्गाची 94,198 प्रकरणे नोंदवली गेली होती.
हवामान बदलाचे परिणाम आणि वाढत्या शहरी घनतेमुळे डासांच्या वाढत्या संख्येचा धोका दरवर्षी वाढतो आहे, या सगळ्या कारणांमुळे पावसाचे स्वरूप विस्कळीत होत आहे आणि पुराची तीव्रता वाढत आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थांमार्फत वाढलेली जागरूकता आणि समन्वयित डास नियंत्रण असूनही, प्रतिबंधात्मक उपाय अनेकदा केवळ संसर्गासाठी सर्वाधिक पोषक हंगामावरच केंद्रित केले जातात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो: डेंग्यू प्रतिबंध कमी प्रतिक्रियात्मक आणि अधिक प्रतिबंधात्मक होऊ शकतो का?
डेंग्यूच्या व्यवस्थापनात पारंपरिकरीत्या प्रौढ डासांची संख्या कमी करण्यावर भर दिला जातो; त्यामुळे हे उपाय सहसा डास दिसू लागल्यावर किंवा आजाराचे प्रमाण वाढू लागल्यावर योजले जातात. हे उपाय आजही महत्त्वाची भूमिका बजावत असले, तरी आता डासांच्या जीवनचक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच या समस्येचे निराकरण करण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. या दृष्टिकोनातून एका महत्त्वपूर्ण वास्तवाची दखल घेतली जाते: सुरुवातीच्या टप्प्यावरच डासांची पैदास रोखल्यास, आजाराचा प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रभावी आणि शाश्वत उपाययोजना करता येते.
आजचे शहरी वातावरण डासांच्या वाढीस पोषक अशा अनेक परिस्थिती निर्माण करते. बांधकाम क्षेत्रे, इमारतींचे छप्पर, कूलर्स, घरातील विविध भांडी, सांडपाण्याची गटारे आणि दुर्लक्षित सार्वजनिक जागा यामध्ये साचलेले पाणी डासांच्या पैदाशीची ठिकाणे बनतात. वाढती लोकसंख्या आणि बदलती पर्यावरणीय परिस्थिती या घटकांमुळे डासांच्या नियंत्रणासाठी अधिक लवकर आणि सातत्याने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते.
साथ रोग नियंत्रणाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे डेंग्यूचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. आजार फैलावण्याच्या पद्धतींमध्ये होत असलेल्या बदलांमुळे, डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी पर्यावरणीय व्यवस्थापन, सामूहिक जन-जागृती आणि वैज्ञानिक नवोपक्रम यांवरील अवलंबित्व वाढते आहे.
आजार पसरण्याच्या पद्धती बदलत असल्याने, प्रभावी प्रतिबंधासाठी वैज्ञानिक नवोपक्रम, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि जनजागृती यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरत आहे. याच विचारातून सर्वसमावेशक वेक्टर व्यवस्थापन (कीटक-वाहक नियंत्रण) उपायांकडे वाटचाल सुरू झाली आहे; हे उपाय केवळ साथीच्या उद्रेकाचा सामना करण्यावरच नव्हे, तर मूळ स्रोतापाशीच रोगाचा धोका रोखण्यावरही भर देतात.
पारंपरिक प्रतिबंधात्मक उपायांच्या पलीकडे जाऊन, डासांची संख्या त्यांच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच कमी करण्यासाठी नवीन धोरणे आखण्यावर अधिक भर दिला जात आहे. यामध्ये फर्मेंटेशन आधारित पद्धतींतून मिळवलेले नैसर्गिक घटक आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक लक्ष्यित उपाययोजनांचा वाढता कल यांचा समावेश होतो. तथापि, शाश्वत परिणाम साधण्यासाठी केवळ नावीन्यपूर्ण उपाय पुरेसे नाहीत; तर त्यासाठी जबाबदार जलव्यवस्थापन आणि आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी लोकांचा सातत्यपूर्ण सहभाग आवश्यक आहे.
आजार रोखण्यासाठी नवनवीन पद्धती विकसित करणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीसोबतच, आपल्या रोजच्या सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. साचलेले पाणी काढून टाकणे, पिण्याच्या पाण्याची साठवणूक सुधारणे, कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे किंवा सार्वजनिक ठिकाणांची नियमित तपासणी करणे यांसारख्या गोष्टी डेंग्यू नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजनांचा पाया आहेत. आपण वापरत असलेली सामाईक ठिकाणे – जसे की निवासी वस्त्या, शाळा, कामाची ठिकाणे, सरकारी कार्यालये आणि आपली घरे – या सर्वांचीच डासांची पैदास वाढवणाऱ्या घटकांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका आहे. केवळ हंगामी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी, जागरूकता, जबाबदारी आणि दैनंदिन सवयींवर आधारित सार्वजनिक आरोग्यासाठी निरंतर मोहीम राबवल्यास अधिक आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास मदत होऊ शकते.
भारताची प्रगती आणि विकास होत असताना, विशेषतः डेंग्यू प्रतिबंधाच्या संदर्भात, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी शहरी वातावरण कसे निर्माण करावे तसेच त्याची देखभाल कशी करावी, याचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे. दीर्घकाळासाठी जोखीम कमी करण्यासाठी, रोगाचा उद्रेक झाल्यानंतर त्यावर केवळ उपाय करण्यासोबतच, अधिक सक्रिय आणि शाश्वत दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. यामध्ये स्वच्छ परिसराची निर्मिती करणे आणि डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुनिश्चित करण्यासाठी समुदायाचा सहभाग तसेच जबाबदारीची भावना वाढवणे यांचा समावेश होतो. शेवटी, डेंग्यूचा उद्रेक आपण किती प्रभावीपणे हाताळतो यावरूनच नव्हे, तर डासांच्या वाढीस पोषक ठरणारी परिस्थिती आपण किती सातत्याने आणि सर्वसमावेशकपणे दूर करतो, यावरूनच आपल्या उपायांचे यश ठरेल.आपल्याला अशी शहरे घडवायची आहेत जी केवळ प्रतिक्रिया न देता प्रतिबंधावर भर देतात. यासाठी वाढलेली जागरूकता, सामाईक जबाबदारी आणि सर्व नागरिकांच्या सातत्यपूर्ण कृतींच्या माध्यमातून प्रतिबंध ही आपल्या दैनंदिन सवयींचा एक भाग बनवणे आवश्यक आहे.
Ans: डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. विशेषतः Aedes जातीच्या डासाच्या चाव्यामुळे हा आजार होतो.
Ans: उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, अंगदुखी, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ आणि मळमळ ही डेंग्यूची सामान्य लक्षणे असू शकतात.
Ans: घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, मच्छरप्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा, खिडक्यांना जाळी लावा आणि पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा.