
भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण
क्षयरोग (टीबी) हा अजूनही भारतातील मोठा संसर्गजन्य आजार असून त्याचा लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. योग्य वेळी तपासणी, पूर्ण उपचार आणि साधे प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक क्षयरोग रुग्ण भारतात आढळतात. २०२० मध्ये जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे २७ टक्के रुग्ण भारतात आढळले आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने प्रभावित होत असल्याने हा सार्वजनिक आरोग्याचा एक गंभीर प्रश्न ठरत आहे. डॉ. शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
क्षयरोग हा जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतो. मात्र काही वेळा तो मेंदू, मणका, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांवरही परिणाम करू शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हा आजार हवेतून पसरतो. योग्य उपचार न घेतल्यास तो जीवघेणा ठरू शकतो, पण वेळेत उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. गंभीर संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर दिसून येतो. यामुळे फुफ्फुस निकामी होण्याची जास्त शक्यता असते. तसेच क्षयरोगाची लागण झाल्यानंतर मेंदू, मणका किंवा मूत्रपिंडासारख्या शरीराच्या इतर भागांवरही परिणाम दिसून येतो.
टीबी झाल्यास अनेक महिने औषधे घ्यावी लागतात. पूर्ण कोर्स न घेतल्यास औषधांना न जुमानणारा टीबी होऊ शकतो.
खोकताना किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू किंवा कोपर वापरा. घरात हवा खेळती राहिल याची काळजी घा व आपल्या घरांत तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा.
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण
टीबी हवेतून पसरत असल्यामुळे संक्रमित व्यक्तीने मास्क वापरल्यास संसर्ग रोखता येतो. भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वेळीच उपचार, स्वच्छता आणि जागरूकता यामुळे क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
Ans: मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होतो. हे जंतू हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात.
Ans: १५ दिवसांपेक्षा जास्त काळ सतत खोकला. खोकल्यातून रक्त किंवा कफ पडणे.
Ans: जेव्हा सक्रिय क्षयरोगाचा रुग्ण खोकतो, शिंकतो किंवा थुंकतो, तेव्हा हवेत पसरलेले जंतू श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर संसर्ग होतो.