
वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका 'हे' पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत
आपल्यातील अनेकांना वर्षाच्या बाराही महिने सर्दी, खोकला, नाकातून पाणी येणे, शिंका येणे इत्यादी समस्या उद्भवतात. ही सर्दी काही केल्या लवकर बरी होत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर काही दिवस सर्दी होत नाही, पण पुन्हा एकदा नाकातून पाणी येणे, शिंका येणे इत्यादी समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते. वारंवार सर्दी खोकला होत असेल तर मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन न करता आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. चांगल्या आरोग्यासाठी आहारात थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. चला तर जाणून घेऊया आहारात खाल्ल्यामुळे सर्दी वाढण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
ट्यूमर मॅपिंग ठरू शकणार गेमचेंजर! रचनेचा सखोल अभ्यास उपचार निवड अधिक अचूक करणार
आहारामध्ये दुधजन्य पदार्थ अतिशय आवडीने खाल्लले जातात. पण ज्या व्यक्तींना सतत कफ किंवा सर्दी होत असेल अशांनी दुधापासून बनवलेले थंडगार पदार्थ खाऊ नये. यामुळे छातीमध्ये कफ जमा होण्यास सुरुवात होते. थंड दूध, आइस्क्रीम किंवा जास्त चीज खाल्ल्यानंतर छातीत कफ साचून राहिल्यामुळे जडपणा जाणवतो. त्यामुळे पनीर किंवा चीजपासून बनवलेले पदार्थ खावेत. तसेच कोमट दुधात हळद मिक्स करून प्यायल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.
दही शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दुपारच्या जेवणात वाटीभर दही खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच पोटात थंडावा कायम टिकून राहील. पण ज्या लोकांना सतत सर्दी किंवा खोकला होतो, अशांनी दह्याचे सेवन करणे टाळावे. तसेच दही रात्रीच्या वेळी खाल्ल्यास कफ वाढून घशात खवखव वाढते आणि सर्दी खोकल्याची समस्या उद्भवते.
केळी खाल्ल्यानंतर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पण सर्दीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी केळी खाल्ल्यास सर्दी वाढू शकते. सकाळी किंवा रात्री केळी खाल्ल्यास नाक बंद होणे, नाकातून पाणी येणे इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे शक्यतो केळी दुपारच्या वेळी खावीत. तसेच फ्रिजमधील थंड पेय किंवा आईस्क्रीम अजिबात खाऊ नये. यामुळे घशावर परिणाम होऊन सर्दी वाढू शकते.
भजी, वडे, फास्ट फूड इत्यादी पदार्थ सतत खाल्ल्यामुळे कफ वाढतो आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. याशिवाय लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जंक फूड खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते आणि आरोग्य बिघडते.त्यामुळे कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
Ans: अॅलर्जी, कमजोर रोगप्रतिकारशक्ती, धूळ, प्रदूषण किंवा काही खाद्यपदार्थांमुळे सतत सर्दी आणि नाकातून पाणी येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Ans: काही लोकांमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे कफ वाढल्यासारखे वाटू शकते. मात्र हे प्रत्येकासाठी सारखेच असेल असे नाही.
Ans: आलं, हळद, तुळस, आवळा, गरम सूप आणि व्हिटॅमिन C युक्त फळांचा आहारात समावेश करावा.