
धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन
रंगपंचमी हा रंगांचा, आनंदाचा आणि मैत्रीचा सण असला तरी तो साजरा करताना आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ठाणे शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक मिसळलेले असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. रासायनिक रंगांमध्ये शिसे, क्रोमियम, तांबे सल्फेट, अॅल्युमिनियम ब्रोमाइड यांसारखे घातक घटक असू शकतात. हे रंग त्वचेवर लावल्यास खाज, पुरळ, सूज, अॅलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य – AI)
डोळ्यात रंग गेल्यास जळजळ, संसर्ग किवा दृष्टीदोषाचा धोका संभवतो. तसेच रंगांची धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास दमा किंवा श्वसनाचे त्रास वाढू शकतात. पर्यावरण अभ्यासकांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.हळद, बीट, पालक, फुलाची पाकळी यासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. अशा रंगांचा वापर केल्यास त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते आणि पाण्याचे प्रदूषणही टाळता येते. तसेच रंगपंचमीदरम्यान पाण्याचा अपव्यय टाळावा, प्लॅस्टिक पिशव्या किंवा फुग्यांचा वापर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!
रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगांचा वापर टाळावा, अशा रंगांमुळे त्वचा, डोळे आणि श्वसनावर दुष्परिणाम होऊ शकतात. नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि कोणतीही अॅलर्जी किया त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या,”डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.