Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातही वाढतोय डिहायड्रेशनचा धोका, होतोय अवयवांवर दुष्परिणाम; तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा

पावसाळा सुरू झाला असला तरीही म्हणावा तसा मुंबईत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्येही डिहायड्रेशनचा धोका वाढताना दिसून येत आहे. याबाबत तज्ज्ञांनी सतर्क राहण्याचा इशारा दिलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 18, 2025 | 02:50 PM
पावसाळ्यात का वाढत आहे डिहायड्रेशन (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यात का वाढत आहे डिहायड्रेशन (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर पावसाळा सुरु होताच उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळतो. पण जसजसे हवामान बदलते तसतशी तहान कमी होऊ लागते. पावसाळ्यात हवामानात आर्द्रता जास्त असल्यामुळे शरीरातून भरपूर प्रमाणात घाम येतो आणि पाण्याची कमतरता निर्माण होते. याच काळात आपल्याकडून कमी पाणी प्यायले जाते कारण या दिवसांत तहान फारच कमी लागते. लहानांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वच वयोगटात, निर्जलीकरणाची(डिहायड्रेशन) समस्या आढळून येत आहे. म्हणूनच गरज भासल्यास वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.

मुंबईतील झायनोव्हा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. निमित नागदा म्हणाले, पावसाळ्यात केवळ अतिसार, बद्धकोष्ठताच नाही तर डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य घटना आहे. जेव्हा तुमचे शरीर जेवढ्या द्रवपदार्थाचे सेवन करते त्यापेक्षा जास्त द्रवपदार्थ गमावते तेव्हा डिहायड्रेशनची समस्या होते. याचा तुमच्या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो आणि मूत्रपिंडांवर ताण येणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, उष्माघात आणि वेळीच उपचार न केल्यास रुग्णालयात दाखल होणे यासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. 

3 वर्षाखालील मुलांमध्ये जुलाब आणि डिहायड्रशेन प्रकरणांमध्ये वाढ, कोणते उपाय करावेत

नेमके कारण काय?

कमी तापमानामुळे पावसाळ्यात लोकांना तहान कमी लागते, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या शरीराला गरज नाही. पावसाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन खूप सामान्य असतात आणि त्यामुळे अतिसार आणि उलट्या होऊन द्रव आणि इलेक्ट्रोलाइट जलदरित्या कमी होतात, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. कामाच्या वेळी किंवा प्रवासादरम्यान पुरेसे पाणी न प्यायल्याने, जास्त घाम आल्याने देखील डिहायड्रेशनची समस्या सतावत आहे. 

काय आहेत लक्षणे आणि उपाय

डॉ. नागदा पुढे म्हणाले की, ओपीडीमध्ये उपचाराकरिता येणाऱ्या २५ ते ५५ वयोगटातील १० पैकी ७ व्यक्तींमध्ये तोंड आणि ओठ कोरडे पडणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी किंवा लघवी कमी होणे, चक्कर येणे किंवा डोकेदुखी आणि स्नायूंमधील वेदना अशा तक्रारी आढळून आल्या आहेत. 

डिहायड्रेशनच्या उपचारांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहील याकरिता ORS चे सेवन करणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये आयव्ही फ्लुइड्सद्वारे उपचारांचा केले जातात. प्रत्येकाने डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची आणि हायड्रेटेड राहण्याची खात्री करा.

पावसाळ्यात सुद्धा होऊ शकतं Dehydration, ‘या’ ५ ड्रिंक्स ठेवतील तुम्हाला Hydrate

डिहायड्रेशन कसे ओळखावे

मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिकच्या रिजनल टेक्निकल चीफ, डॉ. उपासना गर्ग म्हणाल्या की, जर डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर रुग्णाला साध्या रक्त चाचण्या (जसे की सीरम इलेक्ट्रोलाइट्स, युरिया आणि क्रिएटिनिन) तसेच लघवीचे विश्लेषण करण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनचे वेळीच निदान आणि उपचार गंभीर हे गुंतागुंत टाळू शकतात. 

डिहायड्रेशनमुळे थकवा, मूत्रपिंडावर ताण वाढणे, रक्तदाब कमी होणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढू शकते. पावसाळ्यातही, लोकांनी ठराविक अंतराने पाणी प्यावे, विशेषतः जर ते संसर्गातून बरे होत असतील किंवा कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर रहावे लागत असेल. हायड्रेटेड राहणे ही केवळ उन्हाळ्यातच गरजेचे नाही तर ही वर्षभराची म्हणजेच सर्वच ऋतूंमध्ये गरजेचे आहे.

Web Title: The risk of dehydration is increasing even during the monsoon season with adverse effects on organs experts warn of caution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • health care news
  • Health Tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
1

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम
2

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच
3

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

Mouth Ulcer: वारंवार तोंड येतेय का? दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
4

Mouth Ulcer: वारंवार तोंड येतेय का? दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.