Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

कॅन्सर होण्यास दैनंदिन आहारातील चविष्ट आणि आवडीने खाल्लेले पदार्थ कारणीभूत ठरतात. अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 03, 2026 | 08:38 AM
चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका

चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ?
कॅन्सर होऊ नये कोणती काळजी घ्यावी?
दैनंदिन आहारात खालेल्या पदार्थांचा शरीरावर होणारा परिणाम?

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकते. भारतासह जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. अपुरी झोप, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या, पोषक घटकांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरास सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. दैनंदिन आहारात झालेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात चवदार म्हणून खाल्लेले जाणारे कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

रिफाईंन शुगर आणि गोड पेय:

चहा बनवण्यासाठी किंवा इतर गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी साखर वापरली जाते. पण सतत साखरेचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. आधुनिक काळात साखर स्लो पॉयझन मानली जाते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर ज्यामुळे शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढून आरोग्य बिघडते. साखरेचे सेवन केल्यामुळे वाढणारा लठ्ठपणा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतो.

रिफाइंड कार्बोहायड्रेट्स:

दैनंदिन आहारात चविष्ट म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या मैद्याच्या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. मैदा बनवताना त्यातील सर्व फायबर्स काढून टाकले जातात. याशिवाय मैदा पांढरा करण्यासाठी ऑलॉक्सॉन सारख्या रसायनांचा वापर केला जातो. तसेच मैदा खाल्ल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे दैनंदिन आहारात मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नये.

ट्रास फॅट्स:

काहींना सतत बाहेरचे तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. वारंवार उकळल्या तेलात एक्रिलामाईड नावाचे घातक रसायन तयार होते. फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशनमध्ये देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, उच्च तापमानाला गरम केलेल्या पिष्टमय पदार्थांमध्ये एक्रिलामाईड तयार होते, जे शरीरासाठी अतिशयव घातक मानले जाते.

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

अति गरम पेय:

थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण अतिगरम पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. गरम पदार्थांच्या सेवनामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. गरम पेयांचे सेवन केल्यामुळे अन्ननलिकेतील नाजूक आवरणाला इजा होऊन आरोग्य बिघडून जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्करोग म्हणजे काय?

    Ans: शरीरातील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ म्हणजे कर्करोग.

  • Que: कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

    Ans: शरीरात नवीन गाठ येणे किंवा जुन्या गाठीचा आकार बदलणे.

  • Que: कर्करोगाची कारणे कोणती?

    Ans: धूम्रपान, मद्यपान, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव.

Web Title: These foods which are consumed for their delicious taste increase the risk of cancer cancer causing foods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • cancer risks

संबंधित बातम्या

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल
1

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
2

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत
3

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.