Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदूच्या आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतात विषारी, रक्तपुरवठा थांबून उद्भवेल ब्रेन स्ट्रोक किंवा स्मृतीभंशची समस्या

मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2025 | 01:25 PM
मेंदूच्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात विषारी

मेंदूच्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात विषारी

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे सर्वच पदार्थ शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात कायमच हेल्दी आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. मानवी शरीरातील अतिशय गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. मेंदू शरीरातील प्रत्येक कृती, विचार, भावना आणि निर्णय इत्यादींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहे. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे मेंदूचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे स्मृती कमी होणे, लक्ष विचलित होणे, निर्णय घेताना अडचणी निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात खाल्ले जाणारे कोणते पदार्थ मेंदूसाठी विषारी ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ हिरव्या पानांचे करा सेवन, पोट होईल स्लिम

साखरयुक्त एनर्जी ड्रिंक्स:

उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये थंड पेयांचे सेवन केले जाते. पॅकिंग फळांचा रस, कोल्ड्रिंक, कॉफी इत्यादी पेयांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. या पदार्थांमध्ये असलेल्या साखरेमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि मेंदूला सूज येते. याशिवाय नियमित कोल्ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यामुळे अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंशाचा धोका वाढून मेंदूचे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय शरीरात थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आहारात लिंबू, काकडी किंवा पुदिनापासून बनवलेल्या डिटॉक्स पेयांचे किंवा ताज्या फळांच्या रसाचे सेवन करावे.

पॅकबंद स्नॅक्स:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅकबंद स्नॅक्स खाण्याची सवय असते. चिप्स, कुरकुरे किंवा इतर तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच मेंदूच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे स्मृती कमी होणे, मूड स्विंग्स आणि मानसिक आरोग्यात अनेक अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात ॲव्होकॅडो, ड्रायफ्रूट्स, ऑलिव्ह ऑईल, फळे, पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी

पोषक आहार:

मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे आणि हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाही. याशिवाय व्यायाम किंवा ध्यान केल्यामुळे मानसिक आरोग्य बिघडत नाही. शरीराचा समतोल राखण्यासाठी आहारात खाल्ले जाणारे पदार्थ सुद्धा कारणीभूत ठरतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

मेंदूचे आरोग्य कसे सुधारावे?

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबी असलेला आहार घ्या.रोज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळतो.

मेंदूचे आरोग्य बिघडल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

स्मृतीभ्रंश किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.सतत डोकेदुखी होणे.झोपेच्या समस्या, जसे की निद्रानाश.अचानक वर्तनामध्ये बदल होणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These substances are toxic to brain health blood supply will stop and cause brain stroke or memory loss problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • brain
  • Food Safety
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

गुडघेदुखीवर करा आधुनिक पद्धतीने उपचार! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी ठरते पीआरपीटी थेरपी
1

गुडघेदुखीवर करा आधुनिक पद्धतीने उपचार! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी ठरते पीआरपीटी थेरपी

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
3

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
4

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.