
लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा 'हे' उपाय
लघवीमध्ये इन्फेक्शन का वाढते?
मुत्राशयातील इन्फेक्शन रोखण्यासाठी उपाय?
युटीआय इन्फेक्शनची लक्षणे?
शरीरातील विषारी घटक घाम, लघवी आणि शौचावाटे बाहेर पडून जाते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आपल्यातील अनेकांना तासनतास लघवी रोखून धरण्याची सवय असते. पण लघवी रोखून धरल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. ज्याच्या परिणामामुळे किडनी आणि मूत्राशयात इन्फेक्शन वाढते. किडनी निकामी झाल्यानंतर शरीरातील रक्त शुद्ध होत नाही, ज्यामुळे अंगाला खाज येणे, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे वेळीच लघवीला जाणे आवश्यक आहे. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग, किडनी स्टोन, मूत्राशय कमकुवत होणे आणि किडनीवर जास्तीचा तणाव येतो. त्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
मानवी शरीरातील मूत्राशय साधारणपणे ३५० ते ५०० मिली लघवी साठवू शकते. पण ज्यावेळी मूत्राशय पूर्णपणे भरले जाते, तेव्हा मेंदूला लघवीला जाण्याचे संकेत दिले जातात. पण वेळीच लघवीला न गेल्यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात आणि शरीरातील विषारी घटक रक्तामध्ये पुन्हा एकदा शोषून घेतले जातात. लघवी रोखून धरणे म्हणजे शरीरातील घाणेरडे आणि विषारी घटक पुन्हा एकदा तसेच साठवून ठेवणे. चुकीच्या सवयींमुळे हळूहळू शरीर आतून कमकुवत होऊन जाते. त्यामुळे वेळीच लघवीला जाणे आवश्यक आहे.
जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे सगळ्यात गंभीर आजार म्हणजे युटीआय संसर्ग होतो. युटीआय संसर्ग झाल्यानंतर मूत्राशयात वेगाने हानिकारक विषाणू वाढू लागतात. कामाचा ताण, प्रवास किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहचा वापर केल्यामुळे युटीआय इन्फेक्शन वाढते. पण अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयी शरीराचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे युटीआय संसर्ग झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. युटीआय झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी स्टोन, मूत्राशय कमकुवत होणे, किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, पोटात दुखणे, वारंवार लघवीला जावे लागणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. लघवीत वाढलेल्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग किडनीपर्यंत पोहचतो.
मूत्राशयात वाढलेला संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि संसर्गाचा धोका कमी होईल. याशिवाय नाजूक अवयवांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. तसेच कमीत कमी प्रमाणात चहा कॉफीचे सेवन करावे. लघवीला जाण्याची इच्छा झाल्यास लघवी रोखून न धरता तातडीने लघवीला जावे.
Ans: बहुतेकदा आतड्यांमधील बॅक्टेरिया लघवीच्या मार्गात प्रवेश करतात तेव्हा हे संक्रमण होते.
Ans: लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे.
Ans: हे संसर्गाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचा धोका जास्त असतो, कारण स्त्रियांचा मूत्रमार्ग पुरुषांपेक्षा लहान असतो.