Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, जुनाट बद्धकोष्ठतेपासून मिळेल कायमची सुटका

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला सोपा उपाय करावा. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर डिटॉक्स होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 20, 2025 | 11:26 AM
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा 'हा' उपाय ठरेल प्रभावी

आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा 'हा' उपाय ठरेल प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
आतड्यांमध्ये घाण साचून राहण्याची कारणे?
बद्धकोष्ठतेचा लक्षणे?

धावपळीची जीवनशैली, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर अनेक बदल दिसून येतात. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी समस्या प्रामुख्याने उद्भवू लागतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवथित पचन झाल्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.बद्धकोष्ठता झाल्यानंतर वारंवार पोटात दुखणे, कामात लक्ष न लागणे, चीडचडेपणा इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. वारंवार होणाऱ्या ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. पोटात वाढलेल्या लहानशा वेदना कालांतराने गंभीर आजारांचे कारण बनतात. बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या समस्या पोट, आतड्या आणि संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करतात.(फोटो सौजन्य – istock)

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर

बद्धकोष्ठतेची समस्या वाढल्यानंतर शरीरातील विषारी घाण सहज बाहेर पडून जात नाही. आतड्यांमध्ये मल तसाच चिकटून राहतो. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे आतड्यांसोबतच शरीराच्या नाजूक अवयवनाचे नुकसान होते. पोटात साचून राहिलेली घाण शरीरासंबंधित गंभीर आजारांचा जन्म देते. त्यामुळे आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय नियमित केल्यास शरीर स्वच्छ होईल.

सकाळी उठल्यानंतर काय करावे?

प्रेमानंद महाराजांनी सांगितल्यानुसार, सकाळी उठल्यानंतर फॉलो केल्या जाणाऱ्या सवयी शरीराचे आरोग्य कसे राहील हे ठरवते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उठल्यानंतर सगळ्यात आधी देवांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. तसेच तुमच्या क्षमतेनुसार, वज्रासनात बसून अर्धा लिटर किंवा शक्य होईल तेवढ्या प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.

कोमट पाणी पिण्याचे फायदे:

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी प्रभावी ठरते. कोमट पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमधील मल मऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. तसेच शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन करावे. बद्धकोष्ठता, वायू आणि जडपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.

संतुलित आहार:

दैनंदिन आहारात कायमच तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. आहारात डाळभात, भाजी चपाती, दही, फळे, ताज्या भाज्या, पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कधीच गंभीर आजारांची लागण होणार नाही. याशिवाय पचनक्रिया सुद्धा निरोगी राहील. सकाळी ऊठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्यास पोटात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातील.

आतड्यांना बसलेला पीळ सुटून मुळापासून स्वच्छ होईल घाण! पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

उपवास आणि पातळ मूग डाळचे सेवन:

शरीर स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करणे आवश्यक आहे. उपवास केल्यामुळे पोटाला आराम मिळतो. वारंवार बद्धकोष्ठता वाढत असेल तर तीन ते चार दिवस उपवास करावा. उपवासात मूगडाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. जड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठता म्हणजे काय?

    Ans: आठवड्यातून तीनपेक्षा कमी आतड्याची हालचाल होणे, कठीण आणि कोरडे शौच होणे किंवा शौचासाठी खूप ताण येणे

  • Que: बद्धकोष्ठतेची कारणे

    Ans: आहारात फायबरची कमतरता.

  • Que: पचनसंस्था कशी कार्य करते?

    Ans: तोंडात अन्न चावल्यानंतर लाळ मिसळते, ज्यामुळे अन्नाला ओलसरपणा येतो आणि ते अन्ननलिकेतून पोटात जाते.

Web Title: This remedy of premanand maharaj will be effective in removing the dirt from the intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • gut health
  • Health Care Tips
  • Premanand Maharaj

संबंधित बातम्या

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम
1

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर
2

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम
3

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ
4

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.