
तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
संधिवात म्हणजे काय?
संधिवाताची लक्षणे?
हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय?
पूर्वीच्या काळी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या वयाच्या ६० व्या वर्षानंतर उद्भवत होत्या. पण हल्ली तरुण वयातच अनेकांना आरोग्यासंबंधित गंभीर आजार होत आहेत. मधुमेह, कॅन्सर, संधिवात, उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल, हृदयरोग यांसारख्या आजारांची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हाडांसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील अवयवांना इजा पोहचते. शरीरात होणाऱ्या ऑटो-इम्यून बदलांमुळे आणि विटामिनच्या कमतरतेमुळे वयाच्या तिशीमध्येच हाडांमध्ये वेदना वाढू लागल्या आहेत. सांध्यांमध्ये वेदना वाढल्यानंतर चालताना, खाली बसताना किंवा वर उठताना खूप जास्त वेदना होतात. याशिवाय संधिवात झाल्यानंतर हातापायांची बोटे वाकडी होतात. यामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तरुण वयातसंधिवाताची समस्या का उद्भवते? सांध्यांमध्ये वेदना वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
सांध्यांचे १०० हुन अधिक वेगवेगळे आजार असतात. शरीरातील कोणत्याही अवयवाला किंवा हाडाला इजा पोहचू शकते. सांध्यामध्ये ‘कार्टिलेज’ नावाची एक मऊ गादी असते. मऊ गादीसारखा थर हाडांपासून एकमेकांचे घर्षण होण्यापासून बचाव करतो.पण याच कार्टिलेजची झीज झाल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना वाढतात. तर काहीवेळा सांध्यांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. शरीराला येणारी सूज हे सांधेदुखीचे मूळ कारण आहे. त्यामुळे सांध्यांची हालचाल वाढल्यानंतर खूप जास्त तीव्र वेदना होतात. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना केवळ शारीरिक दुखणे नसून दैनंदिन कामांवर होणारा मोठा परिणाम आहे.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. पण विटामिनच्या पातळीमध्ये बदल झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. ७० टक्के पेक्षा जास्त तरुणांमध्ये संधिवाताची समस्या उद्भवते. याशिवाय शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांची घनता कमी होते. त्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक आहे. संधिवात पूर्णपणे बरा करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट्स युक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. तसेच अक्रोड, हळद, सुका मेवा इत्यादी पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होतील.
Ans: सांध्यांमध्ये वेदना (विशेषतः सकाळी उठल्यानंतर)सांध्यांना सूज आणि कोमलता जाणवणे
Ans: ऑस्टियोआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, किशोर संधिवात
Ans: वाढते वय, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा आणि अपुरे पोषण