निर्णय क्षमता
यापैकी सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलांना आत्मविश्वास देणं. आपली मुलं कोणत्याही पद्धतीचं काम योग्य पद्धतीने करू शकतात आणि तिथे कोणाशीही त्यांची कोणाशीही तुलना होत नाहीये ही गोष्ट त्यांना आत्मविश्वासाने समजावून देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर एखाद्या परिस्थितीत निर्णय घ्यायचा झालाच तर कोणताही निर्णय तू योग्यच घेशील हा आत्मविश्वास मुलांना देणं हे पालकांचं मुख्य कर्तव्य आहे. Teenager वयामध्ये मुलांना ही समस्या सर्वात जास्ती उद्भवत असते. त्यामुळे पालकांनी हा आत्मविश्वास त्यांना द्यावा.
तुलना करु नका
दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना देण्यात येणारी जबाबदारी. आपल्या मुलाला हे करता येणार नाही ते करता येणार नाही असं पालकांनी कधीच म्हणू नये. त्यांना घरातली सर्व कामं थोडी थोडी जबाबदारीने द्यायला सुरुवात करा.जसं की, स्वतःचा पाण्याचा ग्लास उचलून ठेवणं, कपड्यांच्या घड्या घालणं या साध्या साध्या गोष्टी त्यांना जबाबदारीने करू द्या. याशिवाय कोणते निर्णय योग्य आहेत हे देखील त्यांना कळायला हवं आणि ते त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा त्यांच्यावरती एक जबाबदारी येऊन पडेल.
मोकळेपणाने संवाद साधणं
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे Teenager वयामध्ये सहसा मुलांना नकारात्मक विचार करण्याची सवय लागून जाते. पण अशा वेळी त्यांना योग्य गोष्ट समजावून देत सकारात्मकता कशी आयुष्यात महत्त्वाची आहे हे देखील पालकांनी मुख्यत्वे करायला पाहिजे. आता म्हणजे नक्की काय? तर त्यांची कोणत्याही मुलांशी तुलना अजिबात करू नका. कारण जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करता तेव्हा ते नकारात्मक विचार चालू करायला सुरुवात करतात की ही गोष्ट मला जमत नाहीये. माझे आई वडील मला सतत बोलतायत. हे त्यांच्याबरोबर अजिबात होऊ देऊ नका.
चुका समजावून सांगणं
या वयामध्ये मुलांना सहसा आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी त्यांना न ओरडता कोणती गोष्ट योग्य आहे किंवा कोणती गोष्ट चुकीची आहे हे समजावून देणं खूप गरजेचं आहे आणि या वयात पालकांनी त्यांचं मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. मुलांच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे हे आपल्याला पालक म्हणून जाणून घेणं खूप गरजेचं आहे.कारण साधारणतः Teenager वयामध्ये त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि याची उत्तरं आपल्याला पालक देणार नाहीत असंही त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधा. अन्यथा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. या पाच गोष्टी पालक म्हणून तुम्ही मुलांना शिकवल्यात तर तुमचं मूल नक्कीच सकारात्मक कायम राहील आणि एक उत्तम माणूस म्हणून जगण्यास त्यांना नक्कीच मदत होईल.
निर्णय क्षमता
यापैकी सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलांना आत्मविश्वास देणं. आपली मुलं कोणत्याही पद्धतीचं काम योग्य पद्धतीने करू शकतात आणि तिथे कोणाशीही त्यांची कोणाशीही तुलना होत नाहीये ही गोष्ट त्यांना आत्मविश्वासाने समजावून देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर एखाद्या परिस्थितीत निर्णय घ्यायचा झालाच तर कोणताही निर्णय तू योग्यच घेशील हा आत्मविश्वास मुलांना देणं हे पालकांचं मुख्य कर्तव्य आहे. Teenager वयामध्ये मुलांना ही समस्या सर्वात जास्ती उद्भवत असते. त्यामुळे पालकांनी हा आत्मविश्वास त्यांना द्यावा.
तुलना करु नका
दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना देण्यात येणारी जबाबदारी. आपल्या मुलाला हे करता येणार नाही ते करता येणार नाही असं पालकांनी कधीच म्हणू नये. त्यांना घरातली सर्व कामं थोडी थोडी जबाबदारीने द्यायला सुरुवात करा.जसं की, स्वतःचा पाण्याचा ग्लास उचलून ठेवणं, कपड्यांच्या घड्या घालणं या साध्या साध्या गोष्टी त्यांना जबाबदारीने करू द्या. याशिवाय कोणते निर्णय योग्य आहेत हे देखील त्यांना कळायला हवं आणि ते त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा त्यांच्यावरती एक जबाबदारी येऊन पडेल.
मोकळेपणाने संवाद साधणं
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे Teenager वयामध्ये सहसा मुलांना नकारात्मक विचार करण्याची सवय लागून जाते. पण अशा वेळी त्यांना योग्य गोष्ट समजावून देत सकारात्मकता कशी आयुष्यात महत्त्वाची आहे हे देखील पालकांनी मुख्यत्वे करायला पाहिजे. आता म्हणजे नक्की काय? तर त्यांची कोणत्याही मुलांशी तुलना अजिबात करू नका. कारण जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करता तेव्हा ते नकारात्मक विचार चालू करायला सुरुवात करतात की ही गोष्ट मला जमत नाहीये. माझे आई वडील मला सतत बोलतायत. हे त्यांच्याबरोबर अजिबात होऊ देऊ नका.
चुका समजावून सांगणं
या वयामध्ये मुलांना सहसा आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी त्यांना न ओरडता कोणती गोष्ट योग्य आहे किंवा कोणती गोष्ट चुकीची आहे हे समजावून देणं खूप गरजेचं आहे आणि या वयात पालकांनी त्यांचं मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. मुलांच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे हे आपल्याला पालक म्हणून जाणून घेणं खूप गरजेचं आहे.कारण साधारणतः Teenager वयामध्ये त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि याची उत्तरं आपल्याला पालक देणार नाहीत असंही त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधा. अन्यथा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. या पाच गोष्टी पालक म्हणून तुम्ही मुलांना शिकवल्यात तर तुमचं मूल नक्कीच सकारात्मक कायम राहील आणि एक उत्तम माणूस म्हणून जगण्यास त्यांना नक्कीच मदत होईल.






