Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

चांगल्या आरोग्यासाठी सात्विक आहारासोबतच जेवणाची योग्य वेळ पाळणं महत्त्वाचं आहे, असं आयुर्वेदात सांगितलं जातं. जाणून घ्या जेवण आणि नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 08, 2024 | 11:21 AM
उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

Follow Us
Close
Follow Us:

जीवनशैली आणि वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे अनेक जण शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. पचनासंबंधीत होणारे आजार, पित्ताचा त्रास आणि मानसिक थकवा जाणवणं या समस्या कमी वयातच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जसा मानसिक आरोग्याचा थेट परिणाम हा शरीरावर दिसून येतो तसंच शरीरातील होणाऱ्या बदलाचा चांगला वाईट परिणाम देखील तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. जसं योग्य आहार शरिरासाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे नाश्ता आणि जेवणाची योग्य वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

आपली भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारित आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित काय काळजी घ्यावी याबाबत आयुर्वेदात सांगितलं आहे. योग्य आहाराप्रमाणेच सकाळचा नाश्ता दुपारचं आणि रात्रीच्या जेवणाची वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे. आहारतज्ज्ञ सांगतात की, ऑफिसच्या कामामुळे अनेक जणांचा जेवणाची वेळ पाळणं शक्य होत नाही. याचा होणारा परिणाम म्हणजे कमी वयात जडणाऱ्या शारीरिक व्याधी. पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती नसल्याने शरीर वातावरणात होणारे बदल सहजपणे स्वीकारु शकत नाही.

हेही वाचा- स्वयंपाकघरातील हे मसाले कमी नाहीत औषधापेक्षा, जाणून घ्या फायदे

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ
सकाळचा नाश्ता
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सात ते आठ यावेळेत नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर ते सकाळी उठेपर्यंत किमान 10 ते 12 तासांचं अंतर असतं. त्यामुळे पोटात अग्नी तयार होतो. योग्य वेळेत नाश्ता न केल्याने पित्त वाढतं आणि याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. म्हणूनच सकाळी लवकर उठल्यावर आधी कोमट पाणी प्या. त्यानंतर सात ते आठ यावेळेत  सात्विक असा पोटभर नाश्ता करा. अनेकांना सकळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र याचं सेवन आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी ऐवजी तुम्ही सकळी ग्रीन टी घेऊ शकता.

हेही वाचा- पोटातील जंतांच्या त्रासाने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोट होईल स्वच्छ

दुपारचे जेवण
सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यात किमान चार तासांचं अंतर असणं महत्त्वाचं आहे. दुपारचं जेवण हे 12 ते 12.30 या दरम्यान करणं महत्त्वाचं आहे. तसंच दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी, गाजर,बीट आणि कडधान्य यांची कोशिंबाीर खा. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. बरेच जण हे दुपारी 3 ते 4 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. दुपारच्या 12.30 पर्यंत जेवण झाल्यानंतर मधल्या वेळेत तुम्ही फळं खाऊ शकता.

रात्रीचं जेवण

बरेच जण रात्री 10 ते 12 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा हळूहळू वाईट परिणाम होतो. आयुर्वेदानुसार सुर्यास्त होण्याआधी रात्रीचं जेवण करणं आरोग्यदायी असल्याचं सांगितलं जातं. चांगल्या आरोग्यासाठी रात्री जेवण हे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत करा. जर हे शक्य होत नसेल तर किमान रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवण करावं. त्यामुळे पचनसंस्था सुधारते असं आहारतज्ज्ञ सांगतात.

 

Web Title: What is the right time to have lunch and breakfast for good health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 12:53 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

हिवाळ्यात गाजराचा ज्यूस पिल्याने काय होते? वृद्धत्व थांबवते अन् याचे फायदे वाचाल तर रोज आहारात समाविष्ट कराल
1

हिवाळ्यात गाजराचा ज्यूस पिल्याने काय होते? वृद्धत्व थांबवते अन् याचे फायदे वाचाल तर रोज आहारात समाविष्ट कराल

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण
2

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
3

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…
4

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.