Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत

जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जेवणाच्या ३० मिनिटांनंतर पाण्याचे सेवन करावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 08:42 AM
जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत

जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत

Follow Us
Close
Follow Us:

पाणी पिण्याचे फायदे?
जेवणानंतर पाणी कधी आणि किती प्रमाणात प्यावे?
जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे?

अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते. जेवणानंतर काहींना एक ग्लास तर काहींना दोन ते तीन ग्लास पाणी पिण्याची सवय असते. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्य बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करतात, यामुळे शरीरावर जमा झालेला चरबीचा अनावश्यक घेर कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला जेवणताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? किती प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

जेवताना शरीराची पचनक्रिया सक्रिय असते. पोटामधील पाचक रस आणि एंजाईम्स अन्नपदार्थ व्यवस्थित पचन करण्यासाठी शरीराला आवश्यक पोषक घटक देतात. अशावेळी लगेच पाणी प्यायल्यामुळे पाचक रस पातळ होतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. या स्थितीमध्ये पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते आणि अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो.

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

अनेकांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पाणी प्यायल्यामुळे पोटात जडपणा वाढतो आणि गॅस तयार होतात. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे जेवल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यास मदत होते. अन्नपदार्थ हळूहळू पचन होतात. जेवणानंतर काही वेळाने पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो.

चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा

जेवताना पाणी पिऊ शकतो का?

जेवताना अजिबात पाणी पिऊ नका. जेवताना थोडीशी तहान लागल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. पण जास्त पाण्याचे सेवन करू नका. जेवण करताना १ किंवा २ घोट पाणी पिणे अतिशय सामान्य आहे. तसेच अन्न पदार्थांसोबतच थंड पाण्याचे अजिबात सेवन करू नका. यामुळे शरीराची पचनक्रिया संथ होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. जेवताना किंवा इतर वेळी घरातील सामान्य तापमानातील पाणी प्यावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. तसेच सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उत्तम मानले जाते. यामुळे संपूर्ण बॉडी डिटॉक्स होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच उभे राहून किंवा घाईगडबडीमध्ये पाणी प्यायल्यास पचनाचे विकार होण्यासोबतच पोटात वेदना होऊ शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: When and how much water should be consumed while eating know how much water to drink will keep digestion strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Boiling Water
  • drinking water tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा
1

चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा

गर्भनिरोधक इंजेक्शनच्या अतिवापरामुळे महिलेला गमवावी लागली दृष्टी! जाणून घ्या इंजेक्शनमुळे होणारे नुकसान
2

गर्भनिरोधक इंजेक्शनच्या अतिवापरामुळे महिलेला गमवावी लागली दृष्टी! जाणून घ्या इंजेक्शनमुळे होणारे नुकसान

World Down Syndrome Day: डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? जगभरात ८०० पैकी १ बाळ प्रभावित, जाणून घ्या सविस्तर
3

World Down Syndrome Day: डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? जगभरात ८०० पैकी १ बाळ प्रभावित, जाणून घ्या सविस्तर

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
4

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.