
जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत
पाणी पिण्याचे फायदे?
जेवणानंतर पाणी कधी आणि किती प्रमाणात प्यावे?
जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे?
अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते. जेवणानंतर काहींना एक ग्लास तर काहींना दोन ते तीन ग्लास पाणी पिण्याची सवय असते. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्य बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करतात, यामुळे शरीरावर जमा झालेला चरबीचा अनावश्यक घेर कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला जेवणताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? किती प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या
जेवताना शरीराची पचनक्रिया सक्रिय असते. पोटामधील पाचक रस आणि एंजाईम्स अन्नपदार्थ व्यवस्थित पचन करण्यासाठी शरीराला आवश्यक पोषक घटक देतात. अशावेळी लगेच पाणी प्यायल्यामुळे पाचक रस पातळ होतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. या स्थितीमध्ये पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते आणि अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो.
अनेकांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पाणी प्यायल्यामुळे पोटात जडपणा वाढतो आणि गॅस तयार होतात. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे जेवल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यास मदत होते. अन्नपदार्थ हळूहळू पचन होतात. जेवणानंतर काही वेळाने पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो.
चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा
जेवताना अजिबात पाणी पिऊ नका. जेवताना थोडीशी तहान लागल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. पण जास्त पाण्याचे सेवन करू नका. जेवण करताना १ किंवा २ घोट पाणी पिणे अतिशय सामान्य आहे. तसेच अन्न पदार्थांसोबतच थंड पाण्याचे अजिबात सेवन करू नका. यामुळे शरीराची पचनक्रिया संथ होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. जेवताना किंवा इतर वेळी घरातील सामान्य तापमानातील पाणी प्यावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. तसेच सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उत्तम मानले जाते. यामुळे संपूर्ण बॉडी डिटॉक्स होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच उभे राहून किंवा घाईगडबडीमध्ये पाणी प्यायल्यास पचनाचे विकार होण्यासोबतच पोटात वेदना होऊ शकतात.