Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘हे’ सोपे उपाय, इन्फेक्शनचा धोका होईल कमी

हवामानात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेण्यासोबतच आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 08:42 AM
बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे उपाय

बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे उपाय

Follow Us
Close
Follow Us:

हवामानातील बदलांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
शरीराची काळजी कशी घ्यावी?
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?

वर्षाच्या बाराही महिने वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. सर्दी, खोकला, ताप इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. हवामानातील बदल, जीवाणू-विषाणूंचा संसर्ग आणि चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट परिणाम करतो. ज्याच्या परिणामामुळे काहीवेळा शरीराला गंभीर आजारांची लागण होते. शरीराचे संतुलन बिघडल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करून शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

ऋतूमध्ये बदल झाल्यानंतर हवामानात सुद्धा अनेक बदल होतात. हे बदल थेट शरीरावर परिणाम करतात. थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर काहींना लगेच सर्दी, खोकला होतो. कितीही उपाय केले तरीसुद्धा सर्दी खोकला थांबत नाही. बाहेरील वातावरण बदलल्यानंतर सुद्धा शरीर आतून स्वतःचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करते. याला होमियोस्टॅसिस असे म्हणतात. बाहेरच्या वातावरणातील बदलांमुळे किंवा संसर्गामुळे शरीराच्या यंत्रणेत अनेक बिघाड होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे इम्युनोग्लोब्युलिन नावाच्या प्रथिनांच्या मदतीने विषाणू आणि जीवाणूंशी लढले जाते.

बदलत्या हवामानानुसार शरीरात होणारे बदल:

सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात काहीवेळा पित्त वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे ऍसिडिटी, अपचन होऊन वारंवार डोकेदुखी, उलट्या, मळमळ जाणवू लागतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची खूप जास्त आवश्यकता असते.

पावसाळ्यात हवा आणि पाण्याद्वारे पसरणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंचा जास्त धोका असतो. हे विषाणू थेट रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. संसर्गाची पातळी वाढल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. डेंग्यू, मलेरिया, कावीळ इत्यादी आजार दूषित पाण्याच्या सेवनामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.

हिवाळ्यातील दमट आणि कमी तापमानामुळे विषाणूंची वाढ वेगाने होते. परागकण आणि थंड हवा संवेदनशील असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर थेट परिणाम करते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. या दिवसांमध्ये हार्ट अटॅक आणिश्वासांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात.

Fatty Liver म्हणजे काय? लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी:

कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार्शक्ती वाढवणे फार आवश्यक आहे. दैनंदिन आहारात पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, सुका मेवा, वेगवेगळ्या सीड्स, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच दुग्धजन्य पदार्थ, अंड्याचा पांढरा भाग आणि मासे इत्यादी पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते?

    Ans: हवामानातील अचानक बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो.

  • Que: कोणते आजार या काळात जास्त होतात?

    Ans: सर्दी, खोकला, ताप, फ्लू, त्वचेचे संसर्ग आणि पोटाचे विकार या काळात जास्त दिसून येतात.

  • Que: इन्फेक्शन टाळण्यासाठी कोणत्या सवयी पाळाव्यात?

    Ans: हात स्वच्छ ठेवणे, उकळलेले पाणी पिणे, गर्दी टाळणे आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Why does illness increase during changing seasons follow these simple measures to take care of the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • Summer

संबंधित बातम्या

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
1

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Tata Motors कडून देशव्यापी समर चेक-अप कॅम्प; ग्राहकांसाठी मोफत तपासणी व खास ऑफर्स
2

Tata Motors कडून देशव्यापी समर चेक-अप कॅम्प; ग्राहकांसाठी मोफत तपासणी व खास ऑफर्स

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम
3

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय
4

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.