Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : ‘त्या’ 27 गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! संघर्ष समितीने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये बेसुमार अनधिकृत बांधकाम झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमधील दस्तनोंदणी बंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ शहरात दस्तनोंदणी सुरू होत

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 04:18 PM
'त्या' 27 गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! संघर्ष समितीने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट (फोटो सौजन्य-X)

'त्या' 27 गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! संघर्ष समितीने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण: ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बांधकाम परवानग्या घेतल्यानंतर २७ गावांचा समावेश केडीएमसी क्षेत्रात करण्यात आला होता. मात्र आता या गावांची दस्तनोंदणी सुमारे आठ वर्षांपासून शासनाने बंद ठेवली आहे. गावांमधील झालेली बांधकाम अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दस्तनोंदणी बंद करण्यात आली आहे. या बंद असलेल्या नोंदणीमुळे स्थानिक लहान उद्योजकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याचदरम्यान आता “स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मुद्यावर आजही आम्ही ठाम आहोत. आमचा मुद्दा २७ गावांचा विकास आहे. त्यापासून आम्ही जरा देखील विचलीत झालेलो नाहीत असा टोला समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी केला आहे.”

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा रखडलेला प्रवास परत झाला सुरु; बळीराजाला मिळाला दिलासा

यावेळी गुलाब वझे यांनी सांगितले की, “२७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात यावी. त्याची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी एका संघर्ष समितीने सभा घेतली. त्यात आमच्या समितीवर टिका केली गेली. आमच्यावर टिका करणारे काल परवापर्यंत आमच्यासोबत होते. तेच लोक प्रतिनिधी आज माजी झाल्यावर आमच्यावर टिका करीत आहे. स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मुद्यावर आजही आम्ही ठाम आहोत. आमचा मुद्दा २७ गावांचा विकास आहे. त्यापासून आम्ही जरा देखील विचलीत झालेलो नाहीत,” असा टोला समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी केला आहे.

२७ गावांच्या विविध प्रश्नावर आज उपाध्यक्ष वझे यांनी आज (17 जून) कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या बैठकीपश्चात उपाध्यक्ष वझे यांनी उपरोक्त टोला लगावला आहे. आमच्या समितीचा अध्यक्ष पद गेल्या १५ वर्षापासून गंगाराम शेलार यांच्याकडे आहे. आत्ता जे समितीचे अध्यक्ष झाल्याचा दावा करीत आहे. त्या अध्यक्ष वर्षाभरापूर्वी झाले असे ते सांगत होते. त्यांना २७ गावांच्या प्रश्नावर बैठक घेण्यासाठी वर्ष का लागले? असा सवाल देखील वझे यांनी उपस्थित केला आहे.

27 गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायतीत असलेले ४९९ सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समावून घ्यावे. सावळाराम महाराज स्मारकाच्या कामाचा डीपीआर लवकर तयार करण्यात यावा. त्यासाठी अतिरिक्त वास्तूविशारद राजू तायशेट्ये यांची नियुक्ती करावी. २७ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रे महापालिकेत घ्यावीत. महापालिकेने कचरा संकलनासाठी नेमलेल्या खाजगी कंपनीत भूमीपूत्रांनाही देखील रोजगाराची संधी द्यावी. त्याचबरोबर २७ गावातील रस्ते गटारे यांच्या कामासाठी निधी द्यावा. या विविध प्रश्नावर आयुक्त गोयल यांच्यासोबत चर्चा करुन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांना एक निवेदन दिले. या प्रश्नावर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली आहे. गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साेबतही या संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे वझे यांनी सांगितले.

PCMC Politics: पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या विविध विकासकामांचे लोकार्पण

Web Title: A taunt from gulab wazhe vice president of the 27 village all party struggle committeec

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • KDMC

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
1

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती
2

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार
3

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार
4

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.