Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम असेल तर मातोश्रीवर परत येत…, आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आवाहन

एकिकडे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आपण अद्यापही शिसेनेतच आहोत. आपण उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. जर उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले होते.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 10, 2022 | 04:31 PM
प्रेम असेल तर मातोश्रीवर परत येत…, आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील, असे वक्तव्य निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचे प्रेम घ्यायला आलोय. मन, ह्रद्य जोडणे जे आहे ते शिवसैनिकांसोबत आहे. ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंवर आहे ते मातोश्रीवर येतात. ज्यांचे प्रेम असेल, जे निष्ठावान असतील. ते मातोश्रीवर येतील, त्यांना माफ करू, निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील.

एकिकडे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आपण अद्यापही शिसेनेतच आहोत. आपण उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. जर उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. तसेच आज शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास जाऊ असे म्हटले आहे. परिणामी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. पुत्र आदित्य ठाकरे (हेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मोठ्या हिमतीने मैदानात उतरले आहेत. पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड झाल्यानंतर सोबत उरलेल्या मोजक्या नेत्यांसोबत आणि असंख्य शिवसैनिकांसोबत या पितापुत्रांनी शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली आहे.

Web Title: Aditya thackeray said matoshris doors are still open for rebel mlas who want to return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 04:31 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BJP
  • Ekanath shinde
  • Nationalist Congress Party
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
1

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
2

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’
3

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
4

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.