
दुपारपर्यंत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत होती. पावसात 40 झाडे पडली . कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामध्ये गोखले कॉलेज समोर एक पत्र्याच्या घराची भिंत दुसऱ्या घरावर पडली आहे. यामध्ये जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच पंचगंगा नदी घाट यासह – शहरातील विविध ठिकाणची 40 झाले पडली आहेत, अशी माहिती महापालिका अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
हवामानात बदल अन् गारांचा पाऊस
दुपारी तीनच्या सुमारास हवामानात अचानक नाट्यमय बदल झाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. पाठोपाठ विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या काही मिनिटांतच शहरासह ग्रामीण भागातही गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर आणि घराच्या छतावर पांढरेशुभ्र थर साचले होते. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.
उष्म्याचा कडेलोट झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी विजांच्या लखलखाट आणी वादळी वाऱ्यासह एक तास पाऊसाची जोरदार हजेरी लागल्याने उष्ण्यापासुन दिलासा मिळाला असला तरी ठिकठिकाणी झाडे व फांद्या तुटल्याने विज गायब झाली. पावसाची एक तासात 22 मि.मी. इतकी नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्यावर गेले काही दिवस झाले नागरिक उष्म्याने हैराण झाले होते. उष्ण्याच्या त्रासाने गडावर पर्यटकांनी पाठ फिरवली होती.
सर्वजण उन्हाच्या झळांमुळे हैराण झाले होते. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. पाऊसाची सर्वजण प्रतीक्षा करत होते. अचानक सायंकाळी 4 वाजता सोसाट्याच्या वादळी वाऱ्याबरोबरच विजांच्या कडकडाटात एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यात थोडावेळ गारा पण पडल्या. संपूर्ण शहरात पावसाने पाणी पाणी करुन टाकले. दरम्यान दुपारपासुनच विज मंडळाने विद्युत पुरवठा खंडित केला होता. तरीसुद्धा उन्मळून पडलेल्या झाडे व फांद्या विज तारांवर पडल्याने दिर्घकाळ विज गायब झाली होती. पडलेल्या जोरदार पावसामुळे नागरीकांना उष्म्यात थोडा दिलासा मिळाला आहे.