Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: एकाही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका! पालकमंत्री विखे पाटलांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

अहिल्यानगरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. याच गोष्टीची गंभीर दखल घेत पालकमंत्री विखे पाटलांनी 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2026 | 08:30 PM
पालकमंत्री विखे पाटलांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

पालकमंत्री विखे पाटलांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका
  • शेतकऱ्याची बिकट अवस्था
  • पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे निर्देश
अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. एकाही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करु नका असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच, बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व गोपालक सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली. वादळी वाऱ्यामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने ९ गायी दगावल्याच्या दुर्दैवी घटनेची त्यांनी पाहणी केली. मंत्री विखे पाटील यांनी घोलप कुटुंबीयांच्या भेट देऊन त्यांना धीर दिला. यावेळी घोलप कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करू.

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

“घोलप कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. संगमनेरमध्ये २. राहुरीत ९ आणि कोपरगावमध्ये १ घराचे नुकसान झाले आहे, या सर्व नुकसानीचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. गुरुवारी पुन्हा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात झालेल्या पावसाने जामखेडमध्ये १ पशुचन दगावले सर्वांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत”, असे वक्तव्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

वादळाने पडलेल्या वीजवाहक तारा व विजेच्या खांबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही वीज वितरण कंपनीला दिले. राहाता तालुक्यात १८ मार्च, ३० मार्च व १ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या पावसाने १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २ हजार ७५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळिंब, हरभरा, टरबूज आणि आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी पाहणीनंतर दिली.

Web Title: Ahilyanagar guardian minister radhakrishna vikhe patil on unseasonal rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Marathi News
  • Radhakrishna Vikhe Patil
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती
1

Ahilyanagar News: नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती

Baramati News : बारामतीमध्ये उडणार भडका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात मोर्चेबांधणी
2

Baramati News : बारामतीमध्ये उडणार भडका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात मोर्चेबांधणी

सरकारचा मोठा निर्णय! Gold खरेदीचे नियम बदलणार;  ग्राहकांना घ्यावी लागणार ‘या’ गोष्टींची काळजी…
3

सरकारचा मोठा निर्णय! Gold खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांना घ्यावी लागणार ‘या’ गोष्टींची काळजी…

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
4

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.