Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

ग्रामीण पाणी पुरवठा अधिक शस्श्वत आणि मजबूत करण्यासाठी 22 मार्चपर्यंत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर जल महोत्सव राबविण्यात येत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 08:58 PM
आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात!

आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात!

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर मधील ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ८ मार्च ते २२ मार्चपर्यंत जिल्हयात सर्वं ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. भंडारी म्हणाले, नदी उत्सवाच्या धर्तीवर जल उत्सवाची परंपरा विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला होता.

या दृष्टिकोनावर आधारित, राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व नीती आयोगाच्या सहकार्याने २०२४ मध्ये २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. आता जल महोत्सव देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टैंड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लिटर प्रतिदिनने पूर्ण झालेल्या योजनांची दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रमाणे सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे. एकाकी/आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. जल महोत्सव जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत अशा तीन स्तरांवर होणार आहे. गाव आणि पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.

महोत्सवांतर्गत होणाऱ्या बाबी…

गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर

महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून)

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा गावातील जलस्रोतांच्या सरक्षणासाठी पुढाकार

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता

पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ

ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश

जल महोत्सवामागील उद्देश…

गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असेल, पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Ahilyangar news jal mahostav started in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: केडगाव-दौंड रोड परिसराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचे विखे पाटलांच्या हस्ते लोकार्पण
1

Ahilyanagar News: केडगाव-दौंड रोड परिसराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचे विखे पाटलांच्या हस्ते लोकार्पण

Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! ‘या’ जातील विशेष मागणी
2

Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! ‘या’ जातील विशेष मागणी

Jalna:  लक्ष्मण हाकेंच्या बारामती आंदोलनाला नवनाथ वाघमारेंचा पाठिंबा
3

Jalna: लक्ष्मण हाकेंच्या बारामती आंदोलनाला नवनाथ वाघमारेंचा पाठिंबा

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ
4

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.