Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026: लाखो वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम

आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने किसन वीर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 11, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वीर साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम
  • वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची केली सोय
  • कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षकांची उपस्थिती
 

 

दरवर्षी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि संघटना पुढाकार घेत असतात. त्याच अनुषंगाने किसन वीर साखर कारखान्याने यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे.

वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतुने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक नामदार मकरंद (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव जमदाडे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.

आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या या वारीत राज्यभरातून लाखो भाविक सहभागी होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. उन्हाळा, पाऊस किंवा इतर कोणत्याही अडचणींची पर्वा न करता ते अखंड हरिनामाच्या गजरात पुढे जात असतात. अशा वेळी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.

 

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

वारकऱ्यांचा सहभाग

आळंदीहून निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातुन वारकरी सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर आणि पुर्ण भक्तीभावाने वारकरी तल्लीन होत असतात, विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करून पंढरपुरी दर्शनासाठी जात असतात. या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवु नये, याकरिता नामदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेकरिता मागील चार वर्षांपासून कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत

कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षकांची उपस्थिती

कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, चिफ इंजिनिअर एस. जी. सुर्यवंशी चिफ केमिस्ट व्ही. एम. गाढवे, डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले, एच. आर. मॅनेजर ए.टी. शिंगटे. को-जन मॅनेजर उद्धव शिंगटे, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, लिगल इन्चार्ज शिवाजी फरांदे, परचेस ऑफिसर संतोष जगताप, सुरक्षा अधिकारी पवनकुमार बाबर, प्रदिप जमदाडे सुनिल ससाणे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानली जाते. या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजापुढे सेवाभाव, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

 

Web Title: Ashadhi wari 2026 kisan veer sugar factory noble initiative quenches the thirst of millions of warkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Warkari Sect

संबंधित बातम्या

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’
1

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’

‘पंढरीची वारी’ आता जागतिक पटलावर! महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष खेळ
2

‘पंढरीची वारी’ आता जागतिक पटलावर! महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष खेळ

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा
4

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.