
मुंबई : औरंगाबाद, (Aurangabad) उस्मानाबाद (Usmanabad) आणि नवी मुंबईच्या (Navi Mumbai Airport) नामांतराचा (Name Change) ठराव आज राज्य विधीमंडळात मंजूर झाला. तो केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी देण्यात आली आहे. अगोदर विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेत सदर तीन प्रस्ताव मंजूर झाले.
[read_also content=”पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय शिपाई भरतीतील गैरप्रकाराचा पर्दाफाश ; पाच परीक्षार्थींना अटक https://www.navarashtra.com/maharashtra/pimpri-chinchwad-police-commissionerate-constable-recruitment-malpractice-exposed-nrab-319312.html”]
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर आक्षेप घेण्यात आला होता. नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे या अगोदर १९९८ साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने २००१ साली रद्द केला. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा दावा याचिकाकर्ते यांनी केला होता. तसेच, हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे.
फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असेही याचिकेत नमुद करण्यात आले होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशीही मागणी केली गेली होती.