
Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले
श्रीगोंदा,अहिल्यानगर: पुणे जिल्ह्यात आणि भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील ‘आर्वी बेट’ या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे या बेटाचा मुख्य भूमीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील सुमारे २०० लोकांची वस्ती पुराच्या पाण्यात अडकली आहे.
Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. अडकलेल्या ग्रामस्थांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी प्रशासनाकडून बोटींचा वापर केला जात आहे. बोटींच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे व त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पूरपरिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक महसूल विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून नदीकाठच्या आणि बेटावरील सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा आणि काळजी घेण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यातील नगर पुणे महामार्गावरील सुपा परिसरात झालेल्या पावसाने शेतकरी, कंपनी कामगार, शालेय विद्यार्थी यांची तारांबळ उडाली. शहराला पहाटे पासूनच पावसाने झोडपून काढले. यात दुध व्यवसायिक शेतकरी, कंपनीत ये-जा करणारे कामगार तसेच जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालये व उच्च्च माध्यमिक विद्यालयात जाणारे विद्यार्थी यांची एकच तारांबळ उडाली. अशीच तारांबळ प्रत्येक वर्षी पावसाळ्यात घडत असते. यावर ठोस पर्याय अद्यापही होऊ शकला नाही. याबाबत नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे येथील तालुका दूध संघापासून बाजार तळाचे सर्व पाणी मेन चौकात येते. हे पाईपच चोकप झाल्यामुळे हे पाणी थेट नगर – पुणे महामार्गावर आले. सुपा मेन चौक व बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एसटी प्रवाशांना पावसाळ्यात सुपा मेन चौकात जाणे येणे कठीण झाले आहे. प्रवासी, कामगार, विद्यार्थी, वयोवृद्ध, महिला यांची आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने दखल घेतली नाही.
सुमारे वीस ते बावीस गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहराला नेहमी वर्दळ असते, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, कंपनी कामगार, शेतकरी, विक्रेते यांना याच चौकातून सुपा शहरात प्रवेश करावा लागतो, याठिकाणी सर्कल तयार करून, रस्ता रूंदीकरणासह अंतर्गत ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून पाणी बाहेर काढून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे.