आगामी लोकसभा निवडणुकीचा धुराळा देशभरात सगळीकडे उडणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेत्यांवर अनेक टीका आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. तसेच शरद पवार यांनी पक्षाचा शपथनाम मांडला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या दहा वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अमित शहांनी आधी हे सांगावं की गेल्या दहा वर्षांत त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी काय काम केलं? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. अशातच महायुतीच्या एका बड्या नेत्याने शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटने सगळीकडे खळबळ माजली आहे. त्यांनी शरद पवार गटावर जहरी टीका केली आहे. शरद पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक आहे. शरद पवारांनी धोका दिल्याच्या घटनेचा दाखल दिला आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.
खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?
महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.
२६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 25, 2024
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे,
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.
खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?
महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.
२६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली.
आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात?
शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!
१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.
१९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.
१९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
१९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.
१९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.
२०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला!
२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली.
खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?, असे लिहीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.