Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Assembly Election 2024: भाजप खासदार अशोक चव्हाणांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हल्लाबोल; म्हणाले…

मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केले. नाना पटोले भाजप सोडून गेले तो दिवस काय समजला पाहिजे? नानांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 14, 2024 | 07:16 PM
Maharashtra Aseembly Election 2024: भाजप खासदार अशोक चव्हाणांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हल्लाबोल; म्हणाले...

Maharashtra Aseembly Election 2024: भाजप खासदार अशोक चव्हाणांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हल्लाबोल; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी देखील तयारीला लागले आहेत. संयुक्तीक आणि पक्षपातळीवर स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी केली जात आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्षांची गडबड सुरू आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने मनोज जरांगे पाटील देखील निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा किंवा पाडण्याबद्दल लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

नांदेड जिल्ह्यात आमचे मोठे नेटवर्क आहे. विधानसभेसाठी आम्ही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीची सत्ता येण्यासाठी सर्वच जण काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मी सर्व बैठकांमध्ये मी सहभागी होत आहे. लोकसभा निवडणुकीत जी परिस्थिती राहिली तीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीला राहील असे नाही. लॉटरी एकदाच लागत असते, सारखी लॉटरी लागत नसते. प्रत्येक वेळी आपल्याला लॉटरी लागेल अशी अपेक्षा नाना पटोले यांना वाटत आहे. मात्र ते शक्य नाही.

भारतात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आहेत. केंद्र सरकारचा मोठा हातभार राज्याच्या विकासासाठी होणार आहे. त्यामुळे लोक विचार करतील. लोकसभेची पुनरावृत्ती होईल असे वाटत नाही. राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केले. नाना पटोले भाजप सोडून गेले तो दिवस काय समजला पाहिजे? नानांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. महायुतीच निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत आहेत. यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना कायद्याचे ज्ञान नसल्याची टीका केली आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष अशी भाषा वापरतो हे केविलवाणे वाटते. वाचनाची सवय नसल्याचे असे होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामुळे त्यावर राजकीय पक्षांनी बोलण्याची गरज नाही असे अशोक चव्हाण म्हणाले.

Web Title: Bjp mp ashok chavan slams nana patole by saying he has no knowledge about election procedure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 07:08 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • BJP
  • Congress
  • Nana patole

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
3

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.