
Buldhana Water Storage
बुलढाणा: पावसाने मोठी दडी मारल्याने पर्जन्यमानाची सरासरी पातळी गाठली न गेल्याचा विपरित परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर झाला. पावसाअभावी शेतीला सिंचनासाठी पर्याय ठरणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्प असलेल्या ५१ जलसंपदा प्रकल्पात ६०.१९ टक्के जलसाठा आहे.
क्रवारच्या सायंकाळपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली असली तरी खरिपाची पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरी, तलाव व जलसंपदा प्रकल्पांवरच विसंबून रहावे लागणार असल्याने जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पातील पाण्यासाठ्याचा शनिवारी सकाळपर्यंतच्या स्थितीचा आढावा घेतला असता. २ मोठ्या व ४ मध्यम प्रकल्पांची स्थिती बऱ्यापैकी आहे. बोटावर मोजता येणाऱ्या प्रकल्पांतच पुरेसा जलसाठा आहे. जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा हे तीन मोठे जलसंपदा प्रकल्प आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील संकल्पित पाणीसाठा २२२.६९ एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ११५.९२१ दलघमी इतका असून, त्याची टक्केवारी ५२.०५ आहे. तर मध्यम प्रकल्पातील संकल्पित पाणीसाठा १३६.११ एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १०४.३८० दलघमी असून, त्याची टक्केवारी ७६.६९ इतकी टक्केवारी आहे. तर एकूण ४१ लघु प्रकल्पामध्ये १०६ इतका संकल्पित पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ५९.४५० दलघमी इतका आहे. तर त्याची ५६.०८ इतकी टक्केवारी आहे.