
Risod Water Shortage
दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रात समाधानकारक पाणीसाठा निर्माण होतो. मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा थेट परिणाम नदीच्या पाणीपातळीवर झाला आहे. पाणीपातळी अशीच खालावत राहिल्यास खरीप पिकांसह रब्बी हंगामातील शेतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पावसाने आगामी काळात समाधानकारक हजेरी लावली नाही, तर मसलापेन परिसरात पाणीटंचाईसह दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणीपातळीवर प्रशासनाने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.