
Ambadas Danve slams governance of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporationa, Ambadas Danve slamas Government, Ambadas Danve Tweet, Chhatarapati Sambhajinagar News,
आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांच्या ‘कारभाराचा’ हा जाहीर पंचनामा! घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे:
“हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने स्वतः ‘हेरिटेज वॉक’ सुरू केल्याचे सांगतात. मात्र हे वॉक सुमारे दहा वर्षांपासून शहरात सुरू आहेत. महापालिका त्यात जाऊन बसली एवढंच! पाणीप्रश्न अधिक बिकट, नागरिक टँकरच्या विळख्यात: पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही नागरिकांना हक्काचे पाणी मिळेना. ५-६ दिवसांऐवजी आता थेट महिन्यातून अवघे ३ (१२० मिनिटे सरासरी) वेळा पाणी मिळत असल्याने संपूर्ण शहर पाण्यासाठी वणवण भटकत आहे.”
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांच्या ‘कारभाराचा’ हा जाहीर पंचनामा! घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे: हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने… — Ambadas Danve (@iambadasdanve) May 21, 2026
“आरोग्याशी क्रूर खेळ: पडेगाव कचरा डेपोला लागलेली आग आणि धुराच्या विळख्यामुळे परिसरातील नागरिकांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना आपली घरे विकण्याची वेळ आली आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि निष्क्रीय महापौर सुस्त बसून आहेत. मान्सूनपूर्व कामांचे वाटोळे: पावसाळा दारावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडलेलीच आहेत. आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.”
OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य
“सामान्यांचे मरण, पदाधिकाऱ्यांची चंगळ: सर्वसामान्य छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे पारंपरिक रविवार, शुक्रवार आणि पीर बाजार बंद करण्याचा निर्णय केवळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी घेण्यात आला आहे. एकीकडे मनपा १२०० कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली असताना, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या चैनीसाठी आलिशान ई-कार खरेदीचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी आहे! केवळ ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’ आणि ‘२०४७ चे व्हिजन’ अशा कागदी आणि चकचकीत घोषणा करून शहराचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचा हा १०० दिवसांचा कार्यकाळ शहराला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे!”
अंबादास दानवे यांच्या या ट्विटनंतर छ. संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चाना जोर आला असून आता सत्ताधारी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?