Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Census Employee Insurance: जनगणनेच्या कामात शिक्षक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? आता शासनाकडे विशेष विम्याची होतेय मागणी

माहिती अधिकारातून (RTI) धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील जनगणना कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे कोणतेही विमा संरक्षण नाही. महाराष्ट्रात ८ शिक्षकांचा मृत्यू झाला असून फेब्रुवारी २०२७ च्या कामावर बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 02:02 PM
जनगणनेच्या कामात शिक्षक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? (Photo Credit- X)

जनगणनेच्या कामात शिक्षक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • जनगणनेच्या कामातील कर्मचाऱ्यांना केंद्राचे विमा संरक्षण नाही
  • RTI मधून धक्कादायक खुलासा
  • राज्यातील ८ शिक्षकांच्या मृत्यूनंतर बहिष्काराचा इशारा!
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): सध्या सुरू असलेल्या जनगणना मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील राष्ट्रीय कर्तव्यावर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वस्तुस्थिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. जनगणनेच्या कामातील लाखो कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही केंद्रीय हमी नसून, केंद्र सरकारने (Central Goverment) विम्यासंदर्भात आपले हात झटकले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील प्रगणक व पर्यवेक्षकांना ५० लाखांचे विशेष विमा संरक्षण, सानुग्रह नुकसानभरपाई आणि कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू कराव्यात, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य जनगणना अधिकाऱ्यांना मुंबई येथे निवेदन देण्यात आले आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ यांच्याकडे माहिती अधिकारात विनायक चौथे यांनी विचारणा केली होती. यावर केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत उत्तरात स्पष्ट केले आहे की, जनगणनेसाठी नियुक्त केलेले प्रगणक व पर्यवेक्षक हे प्रामुख्याने राज्य शासनाचे कर्मचारी असतात. त्यांच्या विमा संरक्षण, सानुग्रह अनुदान किंवा वैद्यकीय भत्त्यांची कोणतीही स्वतंत्र तरतूद किंवा मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारकडे उपलब्ध नाहीत. ही संपूर्ण जबाबदारी संबंधित राज्य सरकार आणि त्यांच्या मूळ विभागाच्या धोरणावरच अवलंबून राहील, असे सांगण्यात आले आहे.

होय, अनेक शिक्षकांना गमवावा लागला जीव

या खुलाशामुळे क्षेत्रीय पातळीवर भरउन्हात, दुर्गम भागात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जनगणनेच्या घर गणना या प्रथम टप्प्यात महाराष्ट्रभरातील अनेक शिक्षक व शिक्षिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही शिक्षक अतिताण व कामाच्या दबावामुळे मृत्यू पावले, तर काही जण शिक्षक जनगणनाच्या मानसिक तणावामुळे हृदयविकाराने, तर काही जनगणनेच्या कर्तव्यावर जात असताना उन्हाच्या उष्णतेच्या लाटेमुळे, तर काही शिक्षक जनगणनेसाठी जात असताना रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्दैवी घटनांमुळे त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक कुटुंबांची आर्थिक व सामाजिक घडी विस्कळीत झाली आहे.

Smart City SPV Maharashtra: स्मार्ट सिटी मिशन संपले तरी ‘SPV’ संस्था कायम राहणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, महापालिका आयुक्तांकडे

या आहेत प्रमुख चार कर्मचाऱ्यांच्या मागण्या

५० लाखांचे विशेष विमा संरक्षण
सानुग्रह नुकसानभरपाई
कॅशलेस वैद्यकीय उपचार
विशेष भत्ते आणि रजा

शासनाने मदत करावी

शिक्षकांनी नियमित शैक्षणिक जबाबदाऱ्यासोबत सुट्टीच्या काळातही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणनेचे काम प्रामाणिकपणे पार पाडले, तरी अशा दुर्घटनांच्या प्रसंगी त्यांच्यासाठी कोणतीही विशेष संरक्षणात्मक यंत्रणा किंवा हमी उपलब्ध नसल्याचे दिसून येते, त्यामुळे जनगणना कार्यात सहभागी होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी विशेष संरक्षण विमा, अपघाती मृत्यू व अपंगत्व भरपाई, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्याची स्वतंत्र व प्रभावी तरतूद शासनाने तातडीने करावी, अशी मागणी शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे.

अन्यथा बहिष्कार घालणार

८ लाखो कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही हमी न देता अशा जोखमीच्या कामावर पाठवणे अत्यंत अन्यायकारक आहे. राज्यात जवळपास ८ शिक्षकांचा जनगणनेच्या कामादरम्यान मृत्यू झाला आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंदर्भात स्वतंत्र शासन निर्णय जारी करावा. पुढील टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे, त्याआधी स्वयंस्पष्ट शासन निर्णय निघाला नाही, तर पुढील कामावर सर्व प्रगणक व पर्यवेक्षक बहिष्कार घालतील. शेख अब्दुल रहीम (राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन)

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

Web Title: No central insurance for census employees rti reveals maharashtra teachers warn boycott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Census
  • central goverment
  • maharashtra

संबंधित बातम्या

Karjat News : विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार; कर्जतच्या भालिवडीत साकारली आधुनिक ‘पिंक रूम’
1

Karjat News : विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार; कर्जतच्या भालिवडीत साकारली आधुनिक ‘पिंक रूम’

NEET परीक्षेपूर्वी बंदीच्या निर्णयाविरोधात ‘Telegram’ थेट हायकोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंजूर!
2

NEET परीक्षेपूर्वी बंदीच्या निर्णयाविरोधात ‘Telegram’ थेट हायकोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंजूर!

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी
3

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

Smart City SPV Maharashtra: स्मार्ट सिटी मिशन संपले तरी ‘SPV’ संस्था कायम राहणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, महापालिका आयुक्तांकडे
4

Smart City SPV Maharashtra: स्मार्ट सिटी मिशन संपले तरी ‘SPV’ संस्था कायम राहणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, महापालिका आयुक्तांकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.