Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ! शिवरायांच्या 12 किल्यांचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही बाब महाराष्ट्र आणि शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची आहे. या निमित्ताने शिवरायांच्या इतिहासाचा गौरव झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 11, 2025 | 10:12 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र म्हंटलं की आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजच उभे राहतात. अशातच UNESCO कडून शिवरायांच्या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा सत्कारच आहे.

कोणत्या किल्ल्यांचा World Heritage List मध्ये समावेश?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य’ संकल्पपूर्तीचे साक्षीदार असलेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजीला युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ चा दर्जा बहाल केला आहे. राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या “मराठा लष्करी स्थापत्य” या प्रस्तावाची केंद्र सरकारने निवड केली.

Devendra Fadnavis: “सायबर गुन्ह्यात ‘फ्रीज’ केलेल्या बँका…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

राजकीय‑सैनिकी धोरणांसाठी या दुर्गांनी दिलेला आधार, तसेच भव्य स्थापत्यशैली व स्थानिक भूगोलाशी असलेली सांगड, यामुळेच त्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित झाले. किल्ल्यांच्या नामांकनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा केला, तर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्को महानिदेशकांना सादरीकरण करून तांत्रिक शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. अपर मुख्य सचिव (सांस्कृतिक कार्य) विकास खारगे, भारताचे युनेस्को प्रतिनिधी विशाल शर्मा आणि उपसंचालक हेमंत दळवी यांनी प्रस्तावाच्या प्रत्येक टप्प्यावर समन्वय साधला. तसेच वास्तुविशारद डॉ. शिखा जैन यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि संचालक डॉ. तेजस गर्ग यांचा परिश्रमही महत्त्वाचा ठरला.

जुलै २०२४ मधील युनेस्कोच्या ४६व्या अधिवेशनात राज्याच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सादरीकरण केले. त्यानंतर ICOMOS तज्ज्ञ ह्वाजोंग ली यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्व १२ किल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या स्थापत्य, संरक्षणयोजना आणि सांस्कृतिक मूल्यांचे मूल्यांकन केले. जिल्हा प्रशासन, वन विभाग व गडसंवर्धन समित्यांनीही आवश्यक सहकार्य केले.

Mithi River: “…यामध्ये मकोकाबाबत विचार केला जाईल”; मिठी नदी प्रकल्पावर मंत्री उदय सामंतांचे वक्तव्य

यादीत समावेश झाल्याने काय होणार?

या नामांकनामुळे गड‑किल्ल्यांचे जतन‑संवर्धन, संशोधन व पर्यावरणीय संरक्षणाला आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळणार आहे. पर्यटन वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तर रोजगारनिर्मितीसह सांस्कृतिक जागरही घडेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शिवरायांच्या ‘स्वराज्य’ विचारसरणीला आणि मराठा सामर्थ्याचा शौर्यवारला जागतिक कीर्ती लाभणार आहे. हा गौरव महाराष्ट्रातील शिवभक्तांपासून देशाच्या सांस्कृतिक शिध्यापर्यंत सर्वांचा सामूहिक अभिमान आहे, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांना स्वराज्याची प्रेरणा आणि इतिहासाचे धडे अधिक दृढपणे आत्मसात करता येणार आहे.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj 12 forts added in unesco world heritage list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल
1

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका
2

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

प्रथमेश परबचा जबरदस्त कमबॅक! ‘गोट्या गँगस्टर’ मध्ये साकारणार अनोखी भूमिका, चित्रपटाचा टीझर लाँच
3

प्रथमेश परबचा जबरदस्त कमबॅक! ‘गोट्या गँगस्टर’ मध्ये साकारणार अनोखी भूमिका, चित्रपटाचा टीझर लाँच

‘बाल विवाह करतोय…’ सूरजनंतर बोहल्यावर चढणार छोटा पुढारी? घनःश्यामचा हळदी Video पाहून नेटकऱ्यांची विनोदी प्रतिक्रिया
4

‘बाल विवाह करतोय…’ सूरजनंतर बोहल्यावर चढणार छोटा पुढारी? घनःश्यामचा हळदी Video पाहून नेटकऱ्यांची विनोदी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.