Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा काडीचाही सहभाग नाही त्यांनी वंदे मातरम वर बोलू नये, RSS च्या शाखेत…; सपकाळांचे आव्हान

पुणे शहरात मुलींसाठी विशेष छात्रों की गुंज कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छात्रों की गुंज हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून तो सर्वांसाठी खुला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2026 | 06:05 PM
स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा काडीचाही सहभाग नाही त्यांनी वंदे मातरम वर बोलू नये, RSS च्या शाखेत...; सपकाळांचे आव्हान

स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा काडीचाही सहभाग नाही त्यांनी वंदे मातरम वर बोलू नये, RSS च्या शाखेत...; सपकाळांचे आव्हान

Follow Us
Follow Us:

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली त्या पुणे शहरात मुलींसाठी विशेष छात्रों की गुंज कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छात्रों की गुंज हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून तो सर्वांसाठी खुला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम शनिवार दि. २२ ॲागस्ट रोजी पुण्याच्या SSPM मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज काँग्रेस नेत्यांनी केली त्यानंतर मैदानातच आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ज्येष्ठ नेते CWC चे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिश्ती यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, २०१४ साली भाजपा सत्तेत आल्यापासून बहुजनांचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने आर्थिक लोभाच्या मोबदल्यात संधी देण्याचा सपाटा लावला आहे. व्यापम घोटाळा आता देशभर पसरला आहे, नीट परिक्षा, न्यायालयातील भरती परीक्षा, टीईटी परिक्षा अशा सर्व परिक्षामध्ये घोटाळे होत असून पेपर फुटीचे ग्रहण लागले लागले. वन नेशन, वन इलेक्शन, याप्रमाणे वन नेशन, वन एक्झामिनेशन लागू करत विशिष्ट जातीवर्ग व पैसे देऊन पेपर विकणे, पक्ष फोडाफोडी करून वन नेशन, वन पार्टी करण्याचा भाजपाचा डाव आहे. परीक्षा आणि शिक्षण या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. मागील १२ वर्षात १५४ वेळा पेपर फुटले आहेत, त्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिला पण मोदी-शाह यांनी चर्चेपासून पळ काढला. शिक्षण व्यवस्था कशी असावी यासाठी व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज अभियान सुरु केले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झी बरोबर केलेला कार्यक्रम हा सिलेक्टिव्ह मुलांसाठी होता. तो मॅच फिक्सिंग कार्यक्रम होता, मोहन भागवत यांच्या फिक्स सामन्यासारखा छात्रों की गुंज हा कार्यक्रम असावा असे फडणवीस यांना वाटत असेल पण हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, त्यांना जर कोणाला पाठवायचे असेल तर त्यांनी पाठवावे. फडणवीस हे उच्च विद्याविभूषित आहेत, बारकोड काय असतो हे त्यांना माहित असावे असे आम्हाला वाटते म्हणून त्यांची टीका हा केविलवाणा प्रकार असून त्यांचे वक्तव्य अज्ञानपूर्ण आहे. छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा व मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने भयगंडातून त्यांनी विधान केले आहे. भाजपाला जळी काष्टी पाषाणी फक्त राहुल गांधीच दिसत आहेत. छात्रों की गुंज कार्यक्रमाला तरुणाईचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाने धसका घेतला म्हणून तिरंगा यात्रा काढावी लागत आहे, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; 36.5 एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

आरएसएसच्या शाखेत वंदे मातरम सुरु करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या कार्यालयावर ५० वर्ष तिरंगा झेंडा फडकावला नाही, ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही संबंध नाही त्यांच्या व त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष ९० वर्षापासून वंदे मातरम गात आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरु, महात्मा गांधी यांनी निश्चित केलेले व गायलेले वंद मातरमच काँग्रेस गाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शाखेत वंदे मातरम गाण्यास सुरुवात करावी असे आव्हानही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has challenged the rss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी
1

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2

Congress leader Sajjan Kumar Passes Away: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे निधन; सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भाजपा सरकारने राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती…; काँग्रेसचा इशारा
3

भाजपा सरकारने राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती…; काँग्रेसचा इशारा

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी
4

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.