Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उल्हासनदी वरील दहिवली मालेगाव पुलासाठी 25 कोटींचा निधी, मात्र पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच

उल्हासनदी वरील दहिवली मालेगाव पुलासाठी 25 कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, या पुलाचे काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी होणार नाही असे चिन्ह दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 17, 2025 | 09:35 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

संतोष पेरणे/कर्जत: कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे 40 वर्षांपूर्वी 110 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला होता. आता त्याच पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाऊन वाहतूक बंद होत होती. मात्र सध्या बांधण्यात येत असलेल्या पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा फार अधिक नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नवीन पुलाची उंची जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा किमान दहा फूट वाढण्याची अपेक्षा असताना फार वाढविली जात नाही. त्यामुळे पुलाच्या उभारणीबद्दल संभ्रम व्यक्त होत आहे.

Sanjay Shirsat: “तुमच्या जहाजातले उंदीर…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

राज्यात बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना उल्हासनदीवर दहिवली मालेगाव येथे पुलाची उभारणी करण्यात आली होती. कालातंराने पुलाची उंची आणि उल्हास नदीला येणारा पूर यामुळे अडचणीची ठरू लागली आहे.अनेक वर्षे पावसाळयात या पुलावरून उल्हासनदीला पूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाण्याच्या घटना घडत असतात. त्याचा परिणाम पुलावरून पलीकडील गावात होणारी वाहतूक बंद होत असे. त्यामुळे सातत्याने 2010 पासून या ठिकाणी नवीन आणि अधिक उंचीचा पूल बांधण्यात यावा अशी मागणी होत होती.

2024 मध्ये नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून 2025 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर सध्या पुलाच्या डावीकडील बाजूस नवीन पूल बांधणायचे काम सुरु झाले असून अनेक ठिकाणी पुलाचे पिलर उभे राहिले आहेत. मात्र पुलाच्या कामाची गती लक्षात घेता यावर्षी पावसाळ्याआधी पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

Mansson Update: पहिल्याच पावसात बहरलं माथेरान ;निळ्याशार आकाशात रंगीबेरंगी उधळण

परंतु सध्या सुरु असलेल्या पुलाचे पिलर लक्षात घेतले असता पुलाच्या उंची बद्दल स्थानिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाळयात पुलावरून महापूर आल्यावर पाणी जाऊ लागते आणि त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद होते. यावर उपाय म्हणून अधिक उंची असलेला नवीन पूल बांधला जात असून पुलाची उंची सध्याच्या पुलाच्या किंना दहा फूट अधिक असेल अशी अपेक्षा होती. त्या ठिकाणी पुलाचे बांधकामासाठी बांधकाऱ्यांत आलेले पिलर यांची उंची पाहिली असता ती पूर्वीच्या पुलाच्या जेमतेम दोन फूट अधिक आहे. त्यामुळे पुढील वर्षी देखील नवीन झालेल्या पुलावरून पाणी जाणार आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्षात ठेवण्याची आवश्यकता असून नवीन पुलाची उंची अधिक ठेवण्यासाठी आताच प्रयत्न सुरु करावेत अशी मागणी जय मल्हार रिक्षा संघटनेचे सदस्य रिक्षाचालक दहिवली गावातील ग्रामस्थ अनिल मते यांनी केली आहे.

Web Title: Dahivali malegaon bridge over ulhas river will not be completed before monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार
1

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख
2

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
3

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
4

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.