Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवरून विरोधकांकडून विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अधिवेशनाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं.

  • By विवेक
Updated On: Sep 20, 2026 | 09:46 PM
Dattatray Bharne

Dattatray Bharne

Follow Us
Follow Us:
  • दत्तात्रय भरणेंची विरोधकांच्या मागणीवर भूमिका
  • अकोला बैठकीत अधिकारी मोबाईलवर व्यस्त; भरणेंनी म्हटलं, “या विषयाकडे लक्ष देऊ नका”
  • “शेतकऱ्यांची स्वप्नं चक्काचूर झाली”; मदतीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही
 

राज्यात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप हंगाम संकटात आला आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक भागांत पिकांचं मोठं नुकसान झालं असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

अकोला येथे अमरावती विभागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यापूर्वी मराठवाड्यातील ७६ तालुक्यांचा आढावा घेण्यात आला होता, तर अमरावती विभागातील ५६ तालुक्यांमधील पीक परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. सरकारकडून एनडीआरएफ, पीक विमा आणि इतर योजनांच्या माध्यमातून मदतीचे पर्याय तपासले जात असल्याचं भरणे यांनी सांगितलं आहे.

विशेष अधिवेशनाबाबत काय म्हणाले कृषिमंत्री भरणे ?

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं मान्य करत भरणे म्हणाले की, “शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाअभावी हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारकडून विविध विभागांचा आढावा घेतला जात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे.”

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

“अधिवेशन बोलावण्याची काही गरज नाही. आम्ही सर्व एकच आहोत ना. शेवटी शेतकऱ्याला आपल्याला मदतच करायची आहे, त्यामुळे त्यासाठी अधिवेशनाची गरज नाही,” असं भरणे यांनी म्हटलं.

अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले?

अकोला येथील आढावा बैठकीदरम्यान काही अधिकारी मोबाईलवर आणि सोशल मीडियावर व्यस्त असल्याचं समोर आलं. या मुद्द्यावर भरणेंनी फारसं महत्त्व न देता शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं.

“कोणी एखादा होपलेस माणूस मोबाईल खेळला, गेम खेळला, याकडे माझ्यासकट आपणही लक्ष देऊ नये. शेतकऱ्याला आधार देणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं सध्या महत्त्वाचं आहे,” असं भरणे म्हणाले.

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर असल्याचं सांगत त्यांनी त्यांना आधार देण्याची गरज व्यक्त केली. “शेतकऱ्यांनी अनेक स्वप्नं रंगवली आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे. शेतकऱ्याला नीट झोप लागत नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळी स्थितीचा व्यापक आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून नेमकी कोणती मदत जाहीर होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Web Title: Dattatray bharne special session drought farmers maharashtra reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • Farmer Issue
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
2

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
4

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.