एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी सुमारे २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार असून कोकण विभागातील बाधित शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता वितरित करण्यात आला असून महाराष्ट्रातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी जमा झाले आहेत. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला…
पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नव्या वादात सापडले आहेत.
कृषीमंत्री भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे.
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे.
15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाहीत तर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.
“पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्ही सुद्धा टाळल्याशिवाय राहणार नाही!” असा थेट इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल, असे मंत्री भरणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी कामं पण सरळ करावी लागतात. यांनी-त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही.
कृषी खात्याचा कारभार आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पदभार स्वीकारताच भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंदापूरच्या विकासाचा शब्द दिला आहे.
नवभारत नवराष्ट्र समुहाच्या वतीने, शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा नवराष्ट्र गर्व्हनर्स अवॉर्ड २०२५ देऊन दत्तात्रय भरणे व पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
काटेवाडी मध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले.
अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे “नागपूर स्पोर्ट्स हब" उभारण्यात येत आहे.