Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नुसतं बोलून काय होणार नाही, कृतीतून दाखवा’; मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यांचे त्याग, बलिदान सर्वांना माहिती आहे. त्यांनी देशासाठी काम केले. त्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. राहुल गांधी अवमान करण्याचे काम करत आहेत. देशाप्रती विरोधात बोलत आहेत. आमची सावरकरांवर श्रद्धा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2023 | 04:23 PM
‘नुसतं बोलून काय होणार नाही, कृतीतून दाखवा’; मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगावातील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाष्य केले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले, ‘सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यांचे त्याग, बलिदान सर्वांना माहिती आहे. त्यांनी देशासाठी काम केले. त्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. राहुल गांधी अवमान करण्याचे काम करत आहेत. देशाप्रती विरोधात बोलत आहेत. आमची सावरकरांवर श्रद्धा आहे. गर्व आहे. ते आमच्या देशवासियांचे दैवत होते. त्यांचा अवमान करणे म्हणजे पूर्ण देशाचा अवमान करणे असा आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधींचा निषेध करावा तेवढं कमी

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढं कमी आहे. राहुल गांधी या देशाची निंदा परदेशात जाऊन करत आहेत. सावरकरांचा अवमान करणाऱ्या या वृत्तीचा निषेध करतो. ते वारंवार अवमान करत आहेत. परदेशात जाऊन देशाची निंदा करणं चुकीचं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार

मालेगावच्या सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे सहन करणार नाही म्हणजे काय करणार? असा सवाल पत्रकारांनी विचारायला हवा. बोलून काय होणार नाही. कृतीतून दाखवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Do not just talk show with action cm eknath shinde challenge to uddhav thackeray nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2023 | 04:18 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • devendra fadnavis
  • Dy CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Mumbai
  • political news

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.