डोंबिवली : डोंबिवलीत महायुतीतील मित्रपक्षाचे नेते एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतांना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून डोंबिवलीत शिवसेना भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये झोपली असतानाच आता शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकमेकांवर चीखलफेक सुरू केली आहे. डोंबिवली युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी काल रवींद्र चव्हाण यांना लक्ष करताना खड्ड्यातून मॅरेथॉन करायला पाहिजे की, शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे अशी टीका केली होती. तर या टीकेला भाजप पदाधिकाऱ्यांनी खरमरीत उत्तर दिलंय. भाजपचे पदाधिकारी नंदू परब, संदीप माळी यांनी 27 गावातील खड्डे भरण्याचा कामात टक्केवारी कोणी खाल्ली असा सवाल करत आमच्या नेत्यांवरील टीका सहन करणार नाही आरेला कारे करू असा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना पर यांनी सांगितले की, भाजप नेहमीच महायुती धर्म पाळते मात्र शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांचा प्रचार केला नसल्याचा गंभीर आरोप देखील केला.
महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जिंकल्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले. लोकसभेमध्ये तुझ्या गळा, माझ्या गळाची भूमिका घेत एकमेकांचा कौतुक करणारे पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकायला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग यावरून अप्रत्यक्षरीत्या भाजपला डीवचण्याच प्रयत्न केला. कदम यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. हा वाद शमतो ना शमतो तोच शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील खड्ड्यांवरून अप्रत्यक्षरीत्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेवरून थेट रवींद्र चव्हाण यांना लक्ष केलं. म्हात्रे यांनी खड्ड्यातून मॅरेथॉन करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे अशी टीका रवींद्र चव्हाण यांच्यावर केली. त्यानंतर भाजप पदाधिकारी देखील आक्रमक झालेत 27 गावातील रस्त्यांवर पडलेला खड्ड्यांसाठी रवींद्र चव्हाण निधी मंजूर करतात. मात्र टक्केवारी कोण खातं याचा शोध घेतला पाहिजे. असं सांगत एक प्रकारे शिवसेनेच्या कोर्टात आपला बॉल टाकला. पुढे बोलताना भाजपाचे उपाध्यक्ष नंदू परब कल्याण ग्रामीणचे भाजपाचे पदाधिकारी संदीप माळी यांनी थेट टक्केवारीचा मुद्दा अधोरेखित करत संशय व्यक्त केलाय? टक्केवारी कोण खातं? हे तपासला पाहिजे असं भाजपचा म्हणणं आहे. आमच्या नेत्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही अशा शब्दात परब यांनी खडे बोल सुनावलेत. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये आम्ही ग्राउंड लेव्हलपासून काम केलं मात्र कोकण पदवीधर मतदार संघात मला मित्रपक्षाने मदत केली नाही अशी नाराजी सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली.कल्याण डोंबिवली शहरातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. इतकाच नाही तर भाजपाने आपल्या मित्र पक्षावर संशय देखील व्यक्त केलाय.त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना भाजपमध्ये फारच काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.