...तर पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे; महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया
अहिल्यानगरमध्ये शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. मात्र ही स्पर्धा चर्चेत राहिली ती नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीची. तेव्हा मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला थेट बाद घोषित केले. त्यामुळे ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण, शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाला विरोध करत थेट पंचाला लाथ मारली. या घटनेवर डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सामना संपल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. यावर पै. चंद्रहार पाटील यांनी, शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले की, पृथ्वीराज मोहोळचं मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यावेळी शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Shivsena : ‘मातोश्री’वर लिंबू अन् काळी जादू’; ‘वर्षा’चा उल्लेख करत संजय राऊत असं का म्हणाले?
एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी जाहीर केलं आहे. तसेच काका पवार तालमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिवराज राक्षे यांचे भाऊ युवराज राक्षे यांनी शिवराज राक्षेच्या अनेक कुस्त्यांचे दाखले देत शिवराजच्या खेळ आणि स्वभाव सांगत पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. सोबतच शिवराजला पंचांकडून शिवीगाळी झाल्यामुळेच त्यावर पंचाला लाथ मारण्याची वेळ आली, असा दावा केला आहे.