
Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अंबरीष टेकडीवरून येणारी पाईपलाईन बोरी नदीच्या जुन्या पुलावरून होती. त्यामुळे नवीन पुल बांधताना जुन्या पुलाचे खांब न तोडता पाईपलाईन जशीच्या तशी ठेवली. काही वर्षांपूर्वी पाईप पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. मात्र त्याच जुन्या सपोर्टवर पाईप टाकले होते.
दोन दिवसांपूर्वी ते वाहून गेले. त्यासोबताच पुलाचा सपोर्ट देखील वाहून गेल्याने आता त्याठिकाणी पाईप टाकणे शक्य नाही. म्हणून पालिकेने पुलावरून पाईप टाकण्याचा निर्णय घेतला. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने विरोध केल्याने सध्याच्या स्थितीतील पाईप टाकणे अशक्य झाले आहे. कमी गेज व कमी वजनाचे पाईप टाकायचे असल्यास ते संबंधित कंपनीकडून पाईप मागवण्यासाठी वेळ लागेल व चाचणीही घ्यावी लागेल आणि त्यांनतर पाईप लाईन जोडणीला चार ते पाच दिवस लागणार आहेत. त्यामुळे एकंदरीत पाणीपुरवठा सुरू करण्यास दहा ते बारा दिवस लागतील.
Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले! नेमकं काय घडलं?
यावर जिल्ह्याचे मुख्यधिकारी गणेश शिंदे म्हणाले की, “66 साधारणतः आठ ते दहा पाईप वाहून गेले आहेत. मात्र शहराला दुसऱ्या पाईप लाईन वरून पैलाड. मुंदडा नगर व लक्ष्मीनगर भागातील टाक्यांवरून ३० टक्के पाणी पुरवठा होऊ शकेल, इतर भागात मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्रास सहन करावा लागेल. पालिकेने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे. नागरिकांनी संयम ठेवावा”
सभापती पाणीपुरवठा समिती कैलास पाटील यांनी देखील या गोष्टीवर भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की, “66 दुष्काळात तेरावा महिना म्हणून शनिवार आणि रविवारी कंपनी बंद असल्याने पाईप येण्यास उशीर होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांनी सहकार्य करावे. जलद गतीने काम केले जाईल.”
Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या …
“पुरामुळे गांधली येथील शुद्ध पाण्याच्या संभ मध्येच गाळ घुसल्याने गांधली पंप बंद पडला आहे. साधारणतः २४ तासात तो पंप सुरू करण्यात येईल सत्येम पाटील, अभियंता, पाणीपुरवठा विभाग ज्या तीन टाक्या सुरू राहणार आहेत तेथून नागरिकांना पिण्याचे पाणी नेण्यासाठी सोय केली जाईल. वापरण्यासाठी प्रत्येक भागात असणाऱ्या बोअरवेल, विहिरी यावरून सोय केली जाऊ शकते, हे अचानक ओढवलेले संकट आहे त्यामुळे नागरिकांनी दहा बारा दिवस सहकार्य करावे पाणी जपून वापरावे” डॉ परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष असे म्हटले आहेत.