Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती ?; कमी पर्जन्यमानाचा फटका

आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या चार ते पाच आठवड्यापासून पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आहे. मात्र अद्यापही दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याची स्थिती आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2023 | 02:40 PM
आंबेगाव तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती ?; कमी पर्जन्यमानाचा फटका
Follow Us
Close
Follow Us:

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या चार ते पाच आठवड्यापासून पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आहे. मात्र अद्यापही दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याची स्थिती आहे.

सप्टेंबर महिना जवळजवळ संपत आला असून, शासनाला आणि बळीराजाला अजूनही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पडणाऱ्या पावसाच्या अपेक्षा आहे. सध्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असली तरी वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या अखेरीस पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकरता येत नाही.

तालुक्याच्या पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस पडला असला तरी, पूर्व भाग मात्र अद्यापही कोरडा ठणठणीत आहे. त्यामुळे या भागात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला, शिवाय असमान पाऊस पडल्याने उत्पादकतेत मोठी घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान शास्त्रीय निकषाप्रमाणे सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, सामान्य फरक आद्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक काढण्यात आल्यानंतर त्यानुसार पिकांची वर्गवारी केली जाईल. त्यानंतर लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला जाईल. ऑगस्ट अखेर राज्यात खरीप हंगामात होणारे सरासरी पेरणी क्षेत्र आणि प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र ३३.३ टक्क्यापेक्षा कमी असेल तर तेथे दुष्काळ समजला जाईल, असे शासनाचे धोरण आहे. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी मातीतील आद्रतेचा उपयोग करता येतो त्यानुसार महालनोबिस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर, नवी दिल्लीच्या संकेतस्थळावर आद्रता निर्देशांक अपडेट केलेला असतो. त्यानुसार जुलै ते फेब्रुवारीपर्यंत निर्देशक तपासून मूल्य काढले जाईल आणि त्यानंतरच दुष्काळाची वर्गवारी केली जाईल.

एकूणच अवर्षनग्रस्त तालुका असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्याचे शास्त्रीय सर्वेक्षण ३० सप्टेंबर नंतर होईल. याआधी दुष्काळ जाहीर करण्यासाठी महसूल विभागाची आणेवारी, पैसेवारी किंवा ग्रीडवारी या पद्धती तसेच नजर पहाणी त्याचबरोबर पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर होत होती. परंतु केंद्र सरकारने २०१६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मध्ये सुधारणा करून नवीन संहिता प्रकाशित केली आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने ऑक्टोबर २०१७ पासून सुरु केली आहे. त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्यास शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे.

Web Title: Drought like situation in ambegaon taluk impact of low rainfall nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2023 | 02:40 PM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.